Thursday, May 03, 2018
शिंपल्याची कलाकुसर
विल्मिंग्टनला राहत असताना समुद्रावर जाणे व्हायचे आणि तिथे गेल्यावर अर्थातच शिंपले वेचणे व्हायचे. शिंपल्यांची मला सुचलेली कलाकुसर
बनवली आहे.
Tuesday, March 06, 2018
फूटपाथ
फूटपाथ आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. फूटपाथ म्हणजे मुख्य रस्ताच्या
बाजूने काढलेली एक पायवाट की ज्यावरून आपण सुरक्षित चालू शकतो. एकीकडे
वाहनांची वर्दळ असते. वाहने कशी जात आहेत यावरून एक नजर टाकता येते. तसेच
वाहने चालवणाऱ्यांनाही एक नजर फुटपाथाकडे टाकता येते. असा हा फूटपाथ माझ्या
आयुष्यात आला. त्याचा सहवास साधारण सव्वा ते दीड वर्षांचा होता. किती आधार
वाटायचा मला याचा !
तब्बल १० वर्षानंतर आम्ही आमचे राहते घर सोडले आणि विनायकच्या नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात आलो. ज्या जागेत आलो ती आम्हाला घ्यावीच लागली. अपार्टमेंटच्या शोधकार्यात चांगला अनुभव आला नाही. शिवाय जे अपार्टमेंट उपलब्ध होते ते मागच्या बाजूला की जिथून फक्त आणि फक्त झाडेच दिसायची. आम्हाला दोघांनाही चालायला खूप आवडते. एके दिवशी विनायक बाहेर फिरायला म्हणून पडला आणि मला येऊन सांगितले की "आपल्या अपार्टमेंटच्या आवारातून बाहेर पडल्यावर एक फुटपाथ लागतो तो थेट इंगल्स ग्रोसरी स्टोअर्स पर्यंत पोहोचतो. तू पण फिरून ये एकदा"
नवीन शहरी विनायक ऑफीसला जायला लागला पण ऑफीसला जाताना पाऊण तास आणि येताना पाऊण तास वेळ. त्यामुळे दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जायचा. सकाळी ८ ला निघायचा ते रात्री ७ ला यायचा. दिवसभर मी एकटीच ! आधी ज्या शहरात आम्ही राहत होतो तेव्हा विनायक दुपारच्या जेवणाला घरी यायचा. त्यामुळे मला थोडीका होईना त्याची सोबत मिळायची व बाकीचा वेळ मी एकेक उद्योग करत रहायचे. दहा वर्षे करत राहिले. रेसिपी लेखन, इतर लेखन, फोटोग्राफी,बदकांना तळ्यावर जाऊन
ब्रेड घालणे, पब्लिक लायबरी मध्ये जाऊन काम करणे, कॉलेजला जाणे. इ. इ. इ. बरेच काही केले. प्रत्येकाला कुठेतरी पुर्णविराम द्यावा लागतो. तेच तेच करण्यातकुठेतरी खूप कंटाळवाणे होऊन जाते आणि नंतर दुसरे काही उद्योग शोधून त्यात मग्न होऊन जातो.
या फूटपाथने मला दुसरे काही शोधण्यात मदत केली. मी खूप ऋणी आहे या फूटपाथाची ! यावरून चालताना मला आधार तर वाटायचाच पण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये चालताना अनुभव व आनंद मिळाला. चालायला ५० मिनिटे लागायची. या फूटपाथवरून चालत जाऊन इंगल्स मध्ये थोडा वेळ घालवल्यामुळे एकदा नोकरीबद्दलचे विचारले असता मला इथे इंगल्स मध्ये नोकरी लागली. सुरवातीला मी वेळ जाण्याकरता या फूटपाथावरून चालत जायचे आणि यायचे. जाताना, येताना व इंगल्स्मध्ये थोडा वेळ बसून, तिथली स्टार बक्स मधली कॉफी पिऊन यायचे. सर्व मिळून माझा तीन तासांचा वेळ जायचा. छान वाटायचे. सकाळी आवरून १० ला निघायचे ते १ पर्यंत जेवायच्या वेळेला घरी यायचे. डोंगराळ भाग असल्याने रस्त उंचसखल आहेत. कधी चढण तर कधी उतरण. एके ठिकाणी थांबायचे थोडे. सिमंटचे दोन कट्टे आहेत समोरासमोर थोडे उंचीला लहान सहज बसता येण्याजोगे. त्यावर बसून थोडा दम खायचे आणि मग निघायचे.
जेव्हा मला इंगल्स मध्ये नोकरी लागली तेव्हा कामावरून येताना फूटपाथवरून चालत यायचे. कामावरून
निघण्याची वेळ ४ होती. निघण्यापूर्वी मी कॉफी आणि थोडेसे काही खाऊन निघायचे. कामाला जाताना जी बॅग होती त्यामध्ये जय्यत तयारी असायची. इथे पाऊस केव्हाही पडतो. कामावर सकाळी जाताना वेदर चॅनलवरचे हवामान पाहायचे. शिवाय हवामानाच्या वेबसाईटवर तासातासाचे हवामान पण नोंदवलेले असते. ते पाहून ४ वाजता नक्की कोणत्या प्रकारचे हवामान आहे हे बघावेच लागायचे. पाऊस असेल तर छत्री आठवणीने न्यावी लागायची. नुसता झिमझिम पाऊस असेल तरी सुद्धा !
थंडीमध्ये कोट, टोपी, मफलर, हातमोजे ठेवायचे. पाणी पिण्याची बाटली, शिवाय थोडीफार कुकीज असायचे. माझे कामावरचे दिवस आठवड्यातून ४ दिवस, त्यातले २ दिवस सोमवार ते शुक्रवार मधले असायचे. प्रत्येक दिवस वेगळा असायचा. कधी झिमझिमणारा पाऊस तर कधी विजा चमकून कोसळणारा. थंडी मध्ये कधी झोंबणारे वारे तर कधी वारे अजिबात नसून
फक्त गोठवणारी थंडी असायची. कधी खूप ढगाळलेले वातावरण तर कधी उनसावलीचा खेळ ! उन्हाळ्यात प्रखर उन. या दिवसात कोट छत्रीचे ओझे नसायचे. पण उन्हाचे चटके खूप बसायचे. जसे थंडी मध्ये खूप थंडी लागू नये म्हणून झपाझप चालणे तसेच उन्हाळ्यात चटके
बसू नयेत म्हणून
पाऊले पटापट उचलायला लागायची. जेव्हा ढगाळलेले वातावरण असायचे तेव्हा रमतगमत छान वाटायचे चालायला.
एक ना अनेक वेगवेगळ्या तऱ्हा. स्नो पडून गेल्यावर व पडत असताना मजा काही वेगळीच. जेव्हा थंडी आणि बोचऱ्या वाऱ्याची भर असायची तेव्हा मफलर खूपच उपयोगी पडायचा. चालताना समोरून वारे यायचे ते अडवण्याकरता नाकापाशी मफलर धरायचे.
क्रमश : .....
तब्बल १० वर्षानंतर आम्ही आमचे राहते घर सोडले आणि विनायकच्या नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात आलो. ज्या जागेत आलो ती आम्हाला घ्यावीच लागली. अपार्टमेंटच्या शोधकार्यात चांगला अनुभव आला नाही. शिवाय जे अपार्टमेंट उपलब्ध होते ते मागच्या बाजूला की जिथून फक्त आणि फक्त झाडेच दिसायची. आम्हाला दोघांनाही चालायला खूप आवडते. एके दिवशी विनायक बाहेर फिरायला म्हणून पडला आणि मला येऊन सांगितले की "आपल्या अपार्टमेंटच्या आवारातून बाहेर पडल्यावर एक फुटपाथ लागतो तो थेट इंगल्स ग्रोसरी स्टोअर्स पर्यंत पोहोचतो. तू पण फिरून ये एकदा"
नवीन शहरी विनायक ऑफीसला जायला लागला पण ऑफीसला जाताना पाऊण तास आणि येताना पाऊण तास वेळ. त्यामुळे दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जायचा. सकाळी ८ ला निघायचा ते रात्री ७ ला यायचा. दिवसभर मी एकटीच ! आधी ज्या शहरात आम्ही राहत होतो तेव्हा विनायक दुपारच्या जेवणाला घरी यायचा. त्यामुळे मला थोडीका होईना त्याची सोबत मिळायची व बाकीचा वेळ मी एकेक उद्योग करत रहायचे. दहा वर्षे करत राहिले. रेसिपी लेखन, इतर लेखन, फोटोग्राफी,बदकांना तळ्यावर जाऊन
ब्रेड घालणे, पब्लिक लायबरी मध्ये जाऊन काम करणे, कॉलेजला जाणे. इ. इ. इ. बरेच काही केले. प्रत्येकाला कुठेतरी पुर्णविराम द्यावा लागतो. तेच तेच करण्यातकुठेतरी खूप कंटाळवाणे होऊन जाते आणि नंतर दुसरे काही उद्योग शोधून त्यात मग्न होऊन जातो.
या फूटपाथने मला दुसरे काही शोधण्यात मदत केली. मी खूप ऋणी आहे या फूटपाथाची ! यावरून चालताना मला आधार तर वाटायचाच पण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये चालताना अनुभव व आनंद मिळाला. चालायला ५० मिनिटे लागायची. या फूटपाथवरून चालत जाऊन इंगल्स मध्ये थोडा वेळ घालवल्यामुळे एकदा नोकरीबद्दलचे विचारले असता मला इथे इंगल्स मध्ये नोकरी लागली. सुरवातीला मी वेळ जाण्याकरता या फूटपाथावरून चालत जायचे आणि यायचे. जाताना, येताना व इंगल्स्मध्ये थोडा वेळ बसून, तिथली स्टार बक्स मधली कॉफी पिऊन यायचे. सर्व मिळून माझा तीन तासांचा वेळ जायचा. छान वाटायचे. सकाळी आवरून १० ला निघायचे ते १ पर्यंत जेवायच्या वेळेला घरी यायचे. डोंगराळ भाग असल्याने रस्त उंचसखल आहेत. कधी चढण तर कधी उतरण. एके ठिकाणी थांबायचे थोडे. सिमंटचे दोन कट्टे आहेत समोरासमोर थोडे उंचीला लहान सहज बसता येण्याजोगे. त्यावर बसून थोडा दम खायचे आणि मग निघायचे.
जेव्हा मला इंगल्स मध्ये नोकरी लागली तेव्हा कामावरून येताना फूटपाथवरून चालत यायचे. कामावरून
निघण्याची वेळ ४ होती. निघण्यापूर्वी मी कॉफी आणि थोडेसे काही खाऊन निघायचे. कामाला जाताना जी बॅग होती त्यामध्ये जय्यत तयारी असायची. इथे पाऊस केव्हाही पडतो. कामावर सकाळी जाताना वेदर चॅनलवरचे हवामान पाहायचे. शिवाय हवामानाच्या वेबसाईटवर तासातासाचे हवामान पण नोंदवलेले असते. ते पाहून ४ वाजता नक्की कोणत्या प्रकारचे हवामान आहे हे बघावेच लागायचे. पाऊस असेल तर छत्री आठवणीने न्यावी लागायची. नुसता झिमझिम पाऊस असेल तरी सुद्धा !
थंडीमध्ये कोट, टोपी, मफलर, हातमोजे ठेवायचे. पाणी पिण्याची बाटली, शिवाय थोडीफार कुकीज असायचे. माझे कामावरचे दिवस आठवड्यातून ४ दिवस, त्यातले २ दिवस सोमवार ते शुक्रवार मधले असायचे. प्रत्येक दिवस वेगळा असायचा. कधी झिमझिमणारा पाऊस तर कधी विजा चमकून कोसळणारा. थंडी मध्ये कधी झोंबणारे वारे तर कधी वारे अजिबात नसून
फक्त गोठवणारी थंडी असायची. कधी खूप ढगाळलेले वातावरण तर कधी उनसावलीचा खेळ ! उन्हाळ्यात प्रखर उन. या दिवसात कोट छत्रीचे ओझे नसायचे. पण उन्हाचे चटके खूप बसायचे. जसे थंडी मध्ये खूप थंडी लागू नये म्हणून झपाझप चालणे तसेच उन्हाळ्यात चटके
बसू नयेत म्हणून
पाऊले पटापट उचलायला लागायची. जेव्हा ढगाळलेले वातावरण असायचे तेव्हा रमतगमत छान वाटायचे चालायला.
एक ना अनेक वेगवेगळ्या तऱ्हा. स्नो पडून गेल्यावर व पडत असताना मजा काही वेगळीच. जेव्हा थंडी आणि बोचऱ्या वाऱ्याची भर असायची तेव्हा मफलर खूपच उपयोगी पडायचा. चालताना समोरून वारे यायचे ते अडवण्याकरता नाकापाशी मफलर धरायचे.
क्रमश : .....
Monday, February 26, 2018
हम दोनो
आमच्या लग्नाला आज ३० वर्षे पूर्ण होत आहेत आणि आम्ही
आता ३१ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. आम्ही दोघांनि एकमेकांना कधीच
पाहिले नव्हते, पण आमच्या आईवडिलांनी एकमेकांना पाहिले होते. माझे सासरे
आणि आणि माझी आई पूर्वी सख्खे शेजारी होते. सासरे नोकरीनिमित्ताने पुण्यात
आले आणि आई लग्न होऊन आली.
माझ्या सासूबाईंनी
मला मागणी घातली आणि आमचे लग्न झाले. बघण्याचा कार्यक्रम १ जानेवारी
१९८४ साली सकाळी ७ वाजता झाला. मी नोकरी करत असल्याने आधी आम्ही
गोऱ्यांच्या घरी गेलो. कांदे पोहे कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने झाला.
माझ्या सासूबाईंनी मला कांदे पोहे आणून दिले आणि आम्ही दोघे बोलण्याऐवजी
त्यांच्या चोघांच्या गप्पाच झाल्या. आम्ही दोघे त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता
एकमेकांकडे कटाक्ष टाकत होतो.
आमचा कांदे
पोह्यांचा कार्यक्रम जरी १ जानेवारी १९८४ झाला असला तरी लग्न मात्र २६
फेब्रुवारी १९८८ साली झाले. ती एक लई मोठी ईष्टोरी आहे बगा. जशी
प्रत्येकाच्या लग्नाची एक वेगळी गोष्ट असते.
आमचा साखरपुडा
झाला आणि आम्ही तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनासाठी गेलो. त्यादिवसानंतर
आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या. आयायटी पवई वरून विनायक दर शुक्रवारी यायचा
आणि आम्ही शनिवार रविवार फिरायचो. फिरण्यापेक्षा आम्ही सिनेमे पहायला
जायचो. संगम, मधुमती, बीस साल बाद, मेरा नाम जोकर इ. इ. आधी मी विनायकच्या
घरी जायचे. मग तिथे चहा पाणी व्हायचे. सुरवातीला सासूबाई खायला
करायच्या. नंतर मीच करायला लागले. सिनेमा पाहून झाल्यावर रिक्शाने विनायक
मला आईच्या घरी सोडायला यायचा. आई मात्र होणाऱ्या जावयाला जेवल्याशिवाय
सोडायची नाही. अगदी पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर चटणी असे साग्रसंगीत जेवण
करायची. पिक्चर पाहिला गेल्यामुळे आमचे दोघांचे बोलणे जास्त व्हायचे नाही.
वि ला पिक्चर पाहायची आवड आहे त्यामुळे मी खुश होते.
लग्नाच्या
आधी फिरायला जाताना एकदा माझा वाढदिवस आला. तेव्हा वि ने आपणहून मला
आणलेली पहिली आणि शेवटची साडी ! आणि गजराही आणलेला ! त्यात भर म्हणजे आम्ही
त्यादिवशी मेरा नाम जोकर हा पिक्चर पहायला गेलो होतो. आणि त्या तिकिटाचे
पैसे माझ्या बहिणीने दिले होते ! ती म्हणाली माझ्यातर्फे तुम्हाला भेट !
आम्ही तिला आमच्याबरोबर यायचा आग्रह केला तर म्हणाली मी कशाला कबाब में
हड्डी!
एकदा पर्वतीवर फिरायला गेलो. तेव्हा आमच्या मध्ये झालेला संवाद
तुला पोळ्या करायला येतात का?
हो. येतात की ! ( म्हणायला काय हरकत आहे, ) नुसत्या पोळ्या नाहीत तर मला पुरणपोळ्याही करता येतात.
पण मी रोज पुरणपोळी खाणार नाहीये. तुला साध्या पोळ्या येतात का?
तू रोज किती पोळ्या खातोस?
दुपारी ४ आणि रात्री ४
म्हणजे चार नि चार ८ आणि माझ्या २ म्हणजे १० , मॅनेजेबल.
एकदा एका गाण्याला विचारले मी, कोण गातय. तर वि म्हणाला तलत. म्हणजे तलत महेमुद. ईई मला अजिबात नाही आवडत तो. वि म्हणाला तलत इज तलत पण त्यापेक्षाही सैगल. सैगल आणि तलत? किती हळूहळू गातात ते ! मला तर किशोर कुमारच आवडतो. किशोरचे गाणे ऐकले की कसा उत्साह संचारतो.
अशी किती गाणी ऐकलीस तू तलत आणि सैगलची. खूप गाणी आहेत. ती ऐक आधी आणि मग सांग मला. नंतर मी बरीच गाणी ऐकली. आपणहून नाही ऐकली. विनायकने ऐकायला लावली आणि मग हळुहळू मलाही तलतच्या आवाजाची गोडी आवडायला लागली. पण तरीही किशोरकुमारच्या आवाजात जादू आहे ना ती तलतमध्ये नाही. पसंद अपनी अपनी !
मला गाण्याचा ठेका आवडतो आणि विनायकला गाण्यामधली कविता आवडते. म्हणजे आधी त्याचे कान गाण्याच्या कवितेकडे जातात आणि माझे कान ठेक्याकडे ! मी पण मग गाण्याचे बोल काय आहेत ते नीट ऐकायला लागले. खरचं गाण्याच्या बोलांमध्ये खूप सुंदर सुंदर अर्थ दडलेले असतात हे खरे आहे.
नंतर विचारले तुला डाळ तांदुळाचे भाव माहीती आहेत का?
असतील काहीतरी, का रे?
अगं आपल्याला १२०० शिष्यवृत्ती मध्ये भागवायचे आहे म्हणून विचारले.
भागेल की. न भागायला काय झाले.
तुला वाचनाची आवड आहे का?
"नाही"
हे उत्तर देऊन एका फटक्यात प्रश्न निकालात काढला. म्हणजे आहे असे उत्तर
दिले की मग काय वाचतेस, किती पुस्तके वाचलीस, कोणते लेखक आवडतात, नकोच
त्या भागगडी. म्हणजे मला वाचनाची आवड आहे पण ति कथा कादंबऱ्यांपुरतीच.
गाण्याची आवड आहे का?
हो. खूपच. अनिल बिस्वास माहीती आहे का?
नाही.
रोशन
हो रोशन माहीती आहे. म्युझिक डायरेक्टर आहे ना?
मी
पण एकदा वि ला विचारले तुला फक्त एकच शर्ट पँट आहे? मला तरी कुठे जास्त
ड्रेस होते. फिरायला जाताना मी आईच्या साड्या नेसून जायचे आणि ब्लाऊज काळा
ठरलेला ! त्यामुळे नंतर फिरायला जाताना लगेच त्याचा दुसरा ड्रेस बाहेर आला !
लग्न झाल्यावर संसाराला सुरवात झाली. आमच्यातला कॉमन
फॅक्टर म्हणजे गाणी. विनायकच्या बॅचलर दिवसातला ट्रांन्झीस्टर आता
आमच्या मॅरिड लाईफ मध्ये नांदू लागला. सकाळी सकाळी विनायक सिलोन लावायचा.
सिलोनची गाणी ऐकायची म्हणजे ते एक प्रकारचे दिव्यच असते. आधी बरीछ खुडबुड
खुडबुड करावी लागते तेव्हा कुठे एखाद दुसरे गाणे ऐकायला मिळते. ते गाणे तो
रेडियोपाशी कान देऊन ऐकायचा. म्हणायचा सुंदर गाणे. मला ती गाणी अजिबातच
ओळखीची वाटायची नाहीत.
एकदा एका गाण्याला विचारले मी, कोण गातय. तर वि म्हणाला तलत. म्हणजे तलत महेमुद. ईई मला अजिबात नाही आवडत तो. वि म्हणाला तलत इज तलत पण त्यापेक्षाही सैगल. सैगल आणि तलत? किती हळूहळू गातात ते ! मला तर किशोर कुमारच आवडतो. किशोरचे गाणे ऐकले की कसा उत्साह संचारतो.
अशी किती गाणी ऐकलीस तू तलत आणि सैगलची. खूप गाणी आहेत. ती ऐक आधी आणि मग सांग मला. नंतर मी बरीच गाणी ऐकली. आपणहून नाही ऐकली. विनायकने ऐकायला लावली आणि मग हळुहळू मलाही तलतच्या आवाजाची गोडी आवडायला लागली. पण तरीही किशोरकुमारच्या आवाजात जादू आहे ना ती तलतमध्ये नाही. पसंद अपनी अपनी !
मला गाण्याचा ठेका आवडतो आणि विनायकला गाण्यामधली कविता आवडते. म्हणजे आधी त्याचे कान गाण्याच्या कवितेकडे जातात आणि माझे कान ठेक्याकडे ! मी पण मग गाण्याचे बोल काय आहेत ते नीट ऐकायला लागले. खरचं गाण्याच्या बोलांमध्ये खूप सुंदर सुंदर अर्थ दडलेले असतात हे खरे आहे.
एकदा
विचारले तू व्यायाम नाही करत? मी म्हणाले व्यायाम? छे, कधीच केला नाही.
मग म्हणाला रोज करत जा. सूर्यनमस्कार घाल रोज. बायकांकरिता हा व्यायाम
चांगला आहे. कसे घालायचे सूर्यनमस्कार? मी सांगतो ना तुला. मग एके दिवशी
१२ सूर्यनमस्कार घातले. पहिल्या दिवशी चांगले वाटले. दुसऱ्या दिवशी ताप
आल्यासारखा वाटला. वि म्हणाला असेच वाटते ताप आल्यासारखे पण तरीही रेटून
व्यायाम करायचा. नंतर तुला चांगले परिणाम दिसायला लागतील. आणि खरेच खूपच
छान परिणाम दिसायला लागले. चपळपणा (होताच आधी) वाढला. आणि मग मी रोजच्या
रोज एका दमात १२ सूर्यनमस्कार घालायला लागले. स्टॅमिना वाढला आणि माझे
वजनही वाढले. एके दिवशी मग मीच वि ला सूर्यनमस्कार घाल असा सल्ला दिला.
अरे, तू घालून बघ, खूपच छान वाटते. हा फक्त जोर बैठकाच घालायचा. त्यालाही
ते पटले. आणि त्याच्या व्यायामात नमस्कारांची भर घातली गेली.
एके
दिवशी म्हणाला योगासने येतात का तुला? मी म्ह्णाले कधी केली नाहीत पण
मला करायला आवडतील. योगासनामध्ये मला सर्वांगसन छानच जमले आणि अजुनही काही
पायांची आसने छान जमली की जी विनायकला जमली नव्हती. मी त्याला म्हणाले की
तु फक्त जोर बैठका घालतोस त्यामुळे लवचिकता आणि चपळपणा आलेला नाहीये. एके
दिवशी मला म्हणाला की तू जोर बैठका घाल. नाही हं जोरबिर नाही मारणार मी.
हे काही बायकांचे व्यायाम नाहीत. असे काही नाहीये. मुली जीम मध्ये जातात
ना? मसल पॉवर येणार कशी मग? मग त्याने मला १२ सूर्यनमस्कारांमध्ये १२ जोर
आणि १२ बैठका घाल असा सल्ला दिला. तसे केलेही. माझी हालत खूपच खराब झाली.
मला बसता येईना की उठता येईना. खूप जडत्व आले. मग मी पण प्रयोग करून करून
एक व्यायाम सेट केला. १२ सूर्यनमस्कार, ४ जोर, ४ बैठका आणि योगासने.
एकदा
साप्ताहिक सकाळमध्ये वाचनात आले की एकसूरी व्यायाम चांगला नाही. आमच्या
व्यायामात चालणे ऍड झाले. रोज जेवणानंतर आम्ही दोघं अर्ध्या तासाची फेरी
मारायला लागलो. व्यायाम म्हणजे लाख दुखोंकी एक दवा आहे ! पण अति व्यायाम
अजिबात नको. जसजसे वय वाढते तसतसे तरूणपणातला व्यायाम उपयोगी पडतो. नंतर
नंतर आठवड्यातून २ ते ३ वेळा व्यायामही पुरेसा होतो. हे अनुभवाचे बोल आहेत.
आम्ही
दोघे खावस असल्याने केलेला पदार्थ अर्धा अर्धा वाटून घेतो. पण तो पदार्थ
चवीला चांगला झाला नसेल तर मी उदारपणाचा आव आणून पाहिजे का अजून? असे वि
ला विचारते आणि बघ मी माझ्या वाटणीतला पदार्थ तुला कसा दिला हे सांगते. मग
म्हणतो मी काय तुला आज ओळखतो काय? आमच्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्याच
आहेत. पण काहीकाही मात्र नाहीत. मला लग्ना आधी आयस्क्रीम अजिबात आवडायचे
नाही ते आवडायला लागले. मला कच्चे तिखट मीठ पोहे खूप आवडतात. वि ला आवडत
नाहीत म्हणून लॅपटॉपवर काही गाणी पाहत होतो आणि माझ्या हातात वाडगा
होता कच्च्या पोह्यांचा तेल तिखट मीठ घालून केलेला. मग म्हणाला मला दे
थोडे. असे म्हणता म्हणता ह्यानेच जवळजवळ सगळे पोहे खाऊन टाकले. आता का रे
पुंगाण्या? पुंगाण्या हा शब्द बाबांचा आहे. आम्ही लहानपणी नको म्हणत
असताना, आम्हाला नाही आवडत हा पदार्थ असे म्हणायचो. खाऊन बघितल्यावर आवडला
की मग खायचो तेव्हा बाबा आम्हाला म्हणायचे. आता का गं पुंगाणे.
प्रयोगशीलता
मात्र खूपच आहे वि मध्ये. लग्न झाल्यावर एकदा कॉंफरन्सला बंगलोर ला गेला
असताना तेथे रसम भातं, सांबारं खाण्यात आले. आल्यावर म्हणाला खूप हलके
हलके वाटते आणि मला पोळ्या अजिबात न करता भात आमटी रोजच्या रोज करायचा असे
सांगितले. ४ च दिवसात खूप अशक्तपणा आला. तसेच भाकरीचेही झाले. कितीही
म्हणले तरी भाकऱ्या कोरड्याच पडतात. पोळी भाजीला पर्याय नाही. काही
दिवसांनी दुपारी फक्त दही साखरच खाण्याचा प्रयोग केला. एक ना दोन हजारो
प्रयोग. कोणताही नवीन प्रयोग वि च्या डोक्यात आला की मला धडकीच भरायची. पण
आता मलाही कळून चुकले आहे की प्रयोग केल्याशिवाय काय चांगले काय वाईट,
कोणते उपयोगी आणि कोणते निरूपयोगी असते ते !
सर्वात खप कश्याचा झाला असेल तर तो पोह्यांचा !
प्रयोग
करून करून आता आमचा आहारही सेट झाला आहे. पोळी भाजी कोशिंबीर, डाळींची
धिरडी, उसळी. भाज्या तर आवडतातच. भाजीशिवाय आमचे पान हालत नाही. अमेरिकेत
आल्यावर आयस्क्रीम बादल्याच्या बादल्या खाल्ले. पोटॅटो चिप्स बरेच खाल्ले.
चॉकलेटेही बरीच खाल्ली. आता हे पदार्थ आम्ही अजिबात आणत नाही. एक मोठी काट
मारली आहे यावर !
या दिवशीच्या निमित्ताने मी फक्त हेच म्हणेन की मित्रमंडळींनो तुमच्या मनात जे जे काही असेल ते ते सर्व तुम्हाला मिळो !!
रौप्य वर्षाचे स्वागत करू या
हर्ष मनीचा प्रकट करू या
ओळखीतून हा विवाह ठरला
बघता बघता संपन्न जाहला /
वधुवर दोघे अनुरूप असता
तर मग फूका उशीर कशाला
संसारगाडा मार्गी लागला
मुंबई क्षेत्री कार्यरत झाला /
तर मग फूका उशीर कशाला
संसारगाडा मार्गी लागला
मुंबई क्षेत्री कार्यरत झाला /
शिक्षणपूर्तता ध्येयास जागला
वधूचीही मनोमन साथ त्याजला
डॉक्टर सन्मान कष्टसाध्य मिळवला
गोऱ्यांचा हा कुलदीपक ठरला/
वधूचीही मनोमन साथ त्याजला
डॉक्टर सन्मान कष्टसाध्य मिळवला
गोऱ्यांचा हा कुलदीपक ठरला/
परदेशगमनाचा बहूमान मिळाला
विनायकरोहिणीची ही संसारगाथा
दीर्घायू चिंतिते तुम्हा उभयता/
माझ्या चुलतसासूबाई सौ सीमा गोरे यांनी ही कविता आमच्या २५ वर्ष लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केली आहे.
Sunday, January 07, 2018
Happy Holidays 2017
हरीश ऋजुता आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन यांना ऍशविलच्या विमानतळावर
सोडले. हा विमानतळ अगदी गावात येण्याजाण्याच्या रस्त्यावर आहे की जिथे फक्त
अमेरिकेतल्या अमेरिकेत जाणारी येणारी विमाने येतात. विनायकचा शाळेतला
मित्र अमेरिकेतील आमच्या घरी येईल असे कधी स्वप्नातही पाहिले नव्हते.
त्यांच्या मुलाकडे ते महिन्याभरासाठी आले आणि योगायोगाने ख्रिसमसची शनिवार
रविवार जोडून सुट्टी आल्याने आम्ही घरीच होतो आणि त्यामुळेच त्यांना
आमच्याकडे बोलावता आले. आम्ही सर्वांनी मिळून दिलखुलास गप्पा मारल्या. जवळ
असलेली ठिकाणे दाखवली. मी जिथे कामाला जाते ते वाण्याचे दुकान दाखवले.
:D क्लेम्सन दाखवले. तिथे आम्ही ज्या घरात राहिलो ती घरे दाखवली. ४ दिवसात त्यांना चारही ऋतुंचे दर्शनही झाले.
:)
घरी थोडी गाणी गायली. सकाळचा वेळ बाहेर फिरणे आणि इथल्या उपहारगृहात जेवण
असा कार्यक्रम आणि संध्याकाळ झाली की घरी बसून गप्पाटप्पा होत होत्या. एक
दिवस मध्ये गेला असेल की लगेचच मेघना आमच्या घरी आली. आल्यावर आपण कधी आणि
कश्या ऑर्कुटवर भेटलो असे आश्चर्यचकीत उद्गार निघाले.
:)
इतके दिवस फक्त फोनवर बोलणाऱ्या आम्ही दोघी प्रत्यक्षात भेटलो. मेघना आमच्या घरी दुपारी आली आणि आम्ही दोघींनी जेवून घेतले. पोळी भाजी आमटी भात असा साधाच स्वयंपाक होता. रात्री मात्र साबुदाणाप्रेमींनी मनसोक्त साबुदाणे वडे खाल्ले.
:D
सोबत नारळाच्या चटणीने चवीमध्ये भर घातली. रात्रभर आम्ही दोघींनी गप्पा
मारल्या. दुसऱ्या दिवशी विनायक ऑफीसमध्ये गेला. मेघनाने आलं घालून गरम गरम
चहा आमच्या दोघींकरता बनवला. चहाची चव कायम लक्षात राहील माझ्या ! नंतर
तिने आणलेला फुलांचा गुच्छ फुलदाणी मध्ये लावला. "चाय पानी" हे ऍशविलमधले
एक भारतीय उपहारगृह आहे तिथे जायचे आदल्यादिवशीच ठरले होते. मला शोभनाने
सांगितले होते की तिथे पाणीपुरी छान मिळते. तेव्हापासून अमेरिकेतली
पाणीपुरी खायची इच्छा पूर्ण करायची असे ठरवले होते. तसे एकदा आम्ही दोघे
गेलोही होतो. पण तिथे पार्कींगला जागा न मिळाल्याने वैतागून परत घरी आलो
आणि खूप भूक लागलेली असताता घरीच पोळी भाजी बनवली होती. या अनुभवानंतर तिथे
अजिबात जायचे नाही असा निश्चय केला होता. पण आशा सुटेना देव भेटेना ! आणि
शेवटी देव भेटलाच नाही !
:D
पाणी पुरी एक नंबर आवडती की जी मी भारतात असताना मनसोक्त खाल्ली होती ती इथे आल्यावर मात्र ती कुठेही अजिबात न मिळाल्याने त्याची चव पूर्णतः विसरले होते. आणि आता आज योग आला आहे त्या आनंदात मी होते. मेघना या आधी तिथे जाऊन आली होती आणि तिथे वडा पाव घेतला होता. ती म्हणाली वडापाव तसा बरा होता पण भारतात मिळणाऱ्या वड्यासारखा नव्हता. आणि तिथे जेवायची थाळी मिळते असेही ऐकले होते. तिथे जाऊन मग आम्ही एका फुलझाडांच्या दुकानात जाणार होतो.
आमच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हे चायपानी नावाचे उपहारगृह होते. तिथे जायला आम्हाला जवळजवळ १ तास लागला. वेळ बघून ठेवली होती. उपहारगृह ३ ला बंद होणार होते. १२ ला निघालो ते १ ला पोहोचलो. पोहोचलो म्हणजे काय जिपिएसने आम्हाला भिरभिर फिरवले. गल्लीबोळातूनही फिरवले. जिथे डेड एंड आहे तिथेही पोहोचवले.
:D ऍशविल मधले क्रेझी ड्राइव्हरही पाहिले.
:(
भारतासारखे थोड्याश्या जागेतून वाट काढणारे ड्राईव्हर पाहून ते आता आमच्या
कारला ठोकतात की काय असे वाटून गेले. ऍशविल डाऊनटाऊनला हे उपहारगृह आहे.
तिथले रस्ते अतिअरूंद असल्याने आणि पार्कींगचा भला मोठा प्रश्न असल्याने
आम्हाला इथे का आलो आहोत? असे होऊन गेले होते.
आमच्या नशिबाने आम्हाला पब्लिक पार्किंमध्ये एक जागा कशीबशी मिळाली. तिथे घुसलो तेव्हा ३ जागा उपलब्ध असा डिजिटल पाटीवर लिहिले होते आणि आमच्या पुढे २ कार होत्या. मिळाली बाई एकदाची जागा ! हुश्श केले आम्ही दोघींनी
:D
आणि इतक्या त्रासानंतर जिथे उपहारगृह होते तिथे अगदी जवळच ही पार्कींगची
जागा होती. फूटपाथवरून चालायला लागलो तर ही मरणाची थंडी ! आणि चायपानी
उपहागृहात पोहोचलो तर तिथे ही रांग! अरे बापरे ! काय प्रकार काय आहे हा?
तिथे जागा बुक केली तर तासाभराने या सांगितले. म्हणजे आम्ही १ ला पोहोचलो
आणि २ ला तिथे बसलो. आणि ३ ला उपहारगृह बंद ! त्याच्या शेजारी असलेल्या एका
कॉफी हाऊस मध्ये शिरलो. आणि तिथे २ कॉफी आणि एक तिरामिसू घेतले.
बिल झाले १८ डॉलर्स. कॉफी एकदम थंडगार आणि आम्हाला जितकी छान मसालेदार असेल अशी वाटली होती तितकी तर ती अजिबातच नव्हती ! तिरामिसू मात्र छानच होते. मग काय वेळ घालवायला आमचे फोटोसेशन सुरू झाले. तिथले लोक्स बघायला लागले. एकदा हाताची घडी घालून फोटो तर एकदा मि म्हणाले माझ्या कानातल्या बाटल्या येऊ देत गं फोटोमध्ये.
:D
तर एकदा मेघना म्हणाली प्रकाश नीट येत नाही म्हणून दिव्याखाली फोटो !
त्रासातून अजून सुटका झाली नव्हती हं आमची ! खरा त्रास तर पुढेच आहे.
:D
तर आम्हाला त्या उपहारगृहाचा फोन आला ही या लवकर. आम्ही गेलो तर आम्हाला
दारासमोर असलेली टेबल आणि खुर्ची होती. गर्दी असल्याने दार सारखे उघडले जात
होते आणि आमच्यावर अतिप्रचंड गार वाऱ्याचा लोट येत होता.
ऑर्डर घ्यायला कुणीही फिरकत नव्हते. उपहारगृह तर मजेशीरच होते चिंचोळ्या आकाराचे ! आम्ही वेटर ला विचारून दुसरीकडे बसलो. पण तिथेही वाऱ्याचा लोट येतच होता. वेटर काही यायला तयार नाही. शेवटी एका बयेला हात दाखवून बोलावले. थाळी घेणार होतो पण सरसोंका साग ही भाजी होती. आम्हाला दोघींनाही ही भाजी आवडत नाही
:(
म्हणून या भाजीला पर्यायी भाजी मिळू शकेल का? असे विचारले असता तिने
थाळीमधला मेन्युच आम्हाला परत वाचून दाखवला ! पाणी पुरी नव्हतीच तिथे.
दहीबटाटाशेवपुरी होती ती ऑर्डर केली आणि एक वडा पाव आणायला सांगितले. इतका
वेळ लावला आणायला.
:(
:( आधी शेवबटाटापुरी आणली तर ती इतकी गारढोण होती की ती फ्रीजर मधून काढून दिली होती असे जाणवत होते.
:D ७ डॉलर्चच्या शेवबटाटापुरी मध्ये फक्त ५ गारढोण पुऱ्या !
:D
वडापावचा तर पत्ताच नाही ! इतका गोंधळ ! त्यांचा गोंधळ पाहता उतप्पाची ऑर्डर दिली. आणि लगेचच उतप्पा हजर ! कठिण आहे. ती उतप्प्याची ऑर्डर दुसऱ्याचीच असणार. आम्ही त्या बयेला म्हणले पण की उत्तप्याची ऑर्डर आम्ही आत्ताच दिली आहे!
:(
बरं ठिक आहे म्हणून आम्ही तो उतप्पा तसाच ठेवू दिला. उतप्पा म्हणजे अरे
देवा ! गार ढोण, शिवाय कोथिंबीर म्हणजे त्या उत्त्प्यावर जणू काही
कोथिंबीरीचे शेत उगवले आहे असे वाटाते इतकी पसरली होती.
:D
:D उतप्पा कच्चा, चटणी आळणी, सांबार थोडेफार चव आहे असे म्हणायला हरकत नाही असे होते.
नंतर परत एक उत्तप्पा आणून दिला आणि बऱ्याच वेळानंतर वडा पाव ! बिनाचवीचे खाऊन समाधान तर अजिबात झाले नव्हते. फक्त पोट भरले होते म्हणून वडा पाव घरी आणून खाल्ला. घरी आल्यावर मात्र ढकलत ढकलत स्वयंपाक केला. झोप येत होती पण झोपावेसे वाटत नव्हते. काही खावेसे वाटत नव्हते. मनः स्ताप झाला होता. पण हा सगळा मूड झोपायच्या आधी बदलून गेला. आम्ही दोघींनीही गाणे रेकॉर्ड करायचे ठरवले होते ते केले आणि मूड छान झाला. कजरा मुहोबतवाला हे गाणे ठरले याचे कारण सूर नवा ध्यास नवा यात एकीने हे गाणे
दोघींच्या स्वरात म्हणले होते आणि ते ऐकल्यावर हेच गाणे आम्ही दोघींनि म्हणायचे ठरवले. गाण्याची रंगीत तालीम झाली आणि गाणे रेकॉर्ड करताना माझ्याकडून चूक झाली. मोतीयन की माला हे नीट म्हणले गेले नाही. नंतर एकदा गायले तेव्हा मेघनाने परत एकदा रंगीत तालीम केली त्यात झुमका ना हार माँगू च्या ऐवजी झुमका ना प्यार माँगू असे म्हणले. मी ते लक्षात आणून दिल्याने आम्ही दोघी खूप हासलो. नंतर रेकॉर्ड करतानाही परत मेघनाने हार च्या ऐवजी प्यार गायले तेव्हा ते माझ्या लक्षात आले होते पण कसेबसे हासू आवरले. ते हासू कसे आवरले ते माझे मलाच माहीत.
:D नंतर रेकॉर्डींग करताना चूक लक्षात आल्यावर परत एकदा गायचे ठरले.
नंतर परत एकदा माझ्याकडून चाल म्हणण्यात चूक झाली. परत एकदा जोरजोरात हासल्लो.
:D
:D
मी म्हणाले जाउदे. हे झाले आहे ते चांगले आहे आणि मुख्य म्हणजे आपण दोघी
कुठे अडखलेलो नाही. हे सर्व रेकॉर्डिंग होईतोवर रात्रीचा १ वाजला. मी
म्हणाले चला झोपुया उद्या कामाला जायचे आहे. तरी झोप कुठली यायला. तु जो
मेरे सुरमें सुर मिलाले गायले. अजून एक दोन गाणी मेघनाने म्हणली. ती मलाही
आवडली. कारण मला जुनी गाणी आवडतात. नवीन गाणीही काही चांगली असतातच पण ऐकत
नसल्याने कळत नाही. शनिवारी सकाळी तिने मला इंगल्स ला सोडले आणि ती पुढे
शार्लटला तिच्या घरी गेली. काम करत असताना माझ्या मनात
कजरा मुहोब्बतवाला सारखे घोळत होते. उपहारगृहामधला सावळा गोंधळ मात्र पहिल्यांदाच अनुभवला. भारतीय उपहारगृहाचे मालक अमेरिकन होते. त्यांनी म्हणे बंगलोर ला जाऊन काही भारतीय फास्ट फूड शिकले असे म्हणतात. Rohini Gore
Wishing you All A Very Happy and Prosperous New Year 2018 !
:D



इतके दिवस फक्त फोनवर बोलणाऱ्या आम्ही दोघी प्रत्यक्षात भेटलो. मेघना आमच्या घरी दुपारी आली आणि आम्ही दोघींनी जेवून घेतले. पोळी भाजी आमटी भात असा साधाच स्वयंपाक होता. रात्री मात्र साबुदाणाप्रेमींनी मनसोक्त साबुदाणे वडे खाल्ले.


पाणी पुरी एक नंबर आवडती की जी मी भारतात असताना मनसोक्त खाल्ली होती ती इथे आल्यावर मात्र ती कुठेही अजिबात न मिळाल्याने त्याची चव पूर्णतः विसरले होते. आणि आता आज योग आला आहे त्या आनंदात मी होते. मेघना या आधी तिथे जाऊन आली होती आणि तिथे वडा पाव घेतला होता. ती म्हणाली वडापाव तसा बरा होता पण भारतात मिळणाऱ्या वड्यासारखा नव्हता. आणि तिथे जेवायची थाळी मिळते असेही ऐकले होते. तिथे जाऊन मग आम्ही एका फुलझाडांच्या दुकानात जाणार होतो.
आमच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हे चायपानी नावाचे उपहारगृह होते. तिथे जायला आम्हाला जवळजवळ १ तास लागला. वेळ बघून ठेवली होती. उपहारगृह ३ ला बंद होणार होते. १२ ला निघालो ते १ ला पोहोचलो. पोहोचलो म्हणजे काय जिपिएसने आम्हाला भिरभिर फिरवले. गल्लीबोळातूनही फिरवले. जिथे डेड एंड आहे तिथेही पोहोचवले.


आमच्या नशिबाने आम्हाला पब्लिक पार्किंमध्ये एक जागा कशीबशी मिळाली. तिथे घुसलो तेव्हा ३ जागा उपलब्ध असा डिजिटल पाटीवर लिहिले होते आणि आमच्या पुढे २ कार होत्या. मिळाली बाई एकदाची जागा ! हुश्श केले आम्ही दोघींनी

बिल झाले १८ डॉलर्स. कॉफी एकदम थंडगार आणि आम्हाला जितकी छान मसालेदार असेल अशी वाटली होती तितकी तर ती अजिबातच नव्हती ! तिरामिसू मात्र छानच होते. मग काय वेळ घालवायला आमचे फोटोसेशन सुरू झाले. तिथले लोक्स बघायला लागले. एकदा हाताची घडी घालून फोटो तर एकदा मि म्हणाले माझ्या कानातल्या बाटल्या येऊ देत गं फोटोमध्ये.


ऑर्डर घ्यायला कुणीही फिरकत नव्हते. उपहारगृह तर मजेशीरच होते चिंचोळ्या आकाराचे ! आम्ही वेटर ला विचारून दुसरीकडे बसलो. पण तिथेही वाऱ्याचा लोट येतच होता. वेटर काही यायला तयार नाही. शेवटी एका बयेला हात दाखवून बोलावले. थाळी घेणार होतो पण सरसोंका साग ही भाजी होती. आम्हाला दोघींनाही ही भाजी आवडत नाही





वडापावचा तर पत्ताच नाही ! इतका गोंधळ ! त्यांचा गोंधळ पाहता उतप्पाची ऑर्डर दिली. आणि लगेचच उतप्पा हजर ! कठिण आहे. ती उतप्प्याची ऑर्डर दुसऱ्याचीच असणार. आम्ही त्या बयेला म्हणले पण की उत्तप्याची ऑर्डर आम्ही आत्ताच दिली आहे!



नंतर परत एक उत्तप्पा आणून दिला आणि बऱ्याच वेळानंतर वडा पाव ! बिनाचवीचे खाऊन समाधान तर अजिबात झाले नव्हते. फक्त पोट भरले होते म्हणून वडा पाव घरी आणून खाल्ला. घरी आल्यावर मात्र ढकलत ढकलत स्वयंपाक केला. झोप येत होती पण झोपावेसे वाटत नव्हते. काही खावेसे वाटत नव्हते. मनः स्ताप झाला होता. पण हा सगळा मूड झोपायच्या आधी बदलून गेला. आम्ही दोघींनीही गाणे रेकॉर्ड करायचे ठरवले होते ते केले आणि मूड छान झाला. कजरा मुहोबतवाला हे गाणे ठरले याचे कारण सूर नवा ध्यास नवा यात एकीने हे गाणे
दोघींच्या स्वरात म्हणले होते आणि ते ऐकल्यावर हेच गाणे आम्ही दोघींनि म्हणायचे ठरवले. गाण्याची रंगीत तालीम झाली आणि गाणे रेकॉर्ड करताना माझ्याकडून चूक झाली. मोतीयन की माला हे नीट म्हणले गेले नाही. नंतर एकदा गायले तेव्हा मेघनाने परत एकदा रंगीत तालीम केली त्यात झुमका ना हार माँगू च्या ऐवजी झुमका ना प्यार माँगू असे म्हणले. मी ते लक्षात आणून दिल्याने आम्ही दोघी खूप हासलो. नंतर रेकॉर्ड करतानाही परत मेघनाने हार च्या ऐवजी प्यार गायले तेव्हा ते माझ्या लक्षात आले होते पण कसेबसे हासू आवरले. ते हासू कसे आवरले ते माझे मलाच माहीत.

नंतर परत एकदा माझ्याकडून चाल म्हणण्यात चूक झाली. परत एकदा जोरजोरात हासल्लो.


कजरा मुहोब्बतवाला सारखे घोळत होते. उपहारगृहामधला सावळा गोंधळ मात्र पहिल्यांदाच अनुभवला. भारतीय उपहारगृहाचे मालक अमेरिकन होते. त्यांनी म्हणे बंगलोर ला जाऊन काही भारतीय फास्ट फूड शिकले असे म्हणतात. Rohini Gore
Wishing you All A Very Happy and Prosperous New Year 2018 !


Thursday, December 21, 2017
भेटवस्तुंची देवाणघेवाण
भेटवस्तुंची देवाण घेवाण : - किती छान वाटते ना !
:)
तर आज आमच्या इंगल्स स्टोअर्स मध्ये सगळ्यांसाठी स्नॅक्स आणि कोल्ड्रींक
होते. दोन तीन प्रकारच्या कुकीज, दोन तीन प्रकारची चॉकलेटे, केक, बटाटा
चिप्स, इ. इ. होते. तिथे भेटवस्तू पण रॅप करून ठेवल्या होत्या. त्या वस्तू
म्हणजे सिक्रेट सांता त्याकरिता आधी आपले नाव यादीत द्यावे लागते. २
वर्षांपूर्वी मला नोव्हेंबर मध्ये नोकरी लागली होती तेव्हा काही माहीती
नव्हते. दुसऱ्या वर्षी माहीती झाले होते पण कार्मेन म्हणाली की ती यामध्ये
भाग घेत नाही म्हणून मी पण भाग घेतला
नव्हता. तर आधी यादीत आपले नाव द्यावे लागते आणि जी भेटवस्तू द्यायची असते
ती १० डॉलर्स च्या खाली असता कामा नये. १० डॉलर्स च्या वरती कितीही चालेल.
आणि नंतर २ दिवसांनी आपल्याला एक चिठ्ठी उचलायची असते. त्या चिठ्ठीत कोणाला
भेटवस्तू तुम्ही देणार आहात त्याचे नाव लिहिलेले असते. पण आपण
ज्याच्याकरता भेटवस्तू देणार आहोत ते त्याला कळवून द्यायचे नसते. तर आज
काहींना ज्या भेटवस्तू मिळाल्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
विकीला के कडून भेटवस्तू मिळाली ती म्हणजे कानातले आणि काचेची एक बाहूली. खूप छान होती. पिझ्झा बार मध्ये एक मेक्सिको देशातली मुलगी आहे तिला मोठा मेक अप बॉक्स मिळाला. हा बॉक्स तिला बेकरी मध्ये काम करणाऱ्या मुलीकडून मिळाला. मेक अप बॉक्स मिळाल्यावर ती खूपच खुष झाली होती. ती रोज चेहऱ्याला काय काय लावून येते. काजळ, लाली, डोळे वाढवते. पापणीच्या वर रंग लावते. त्या रंगांमध्ये चमचम पण असते. तिला ते खूप छान दिसते. एकीला प्रोड्युस मधल्या मॅजेजर कडून एक उबदार पांघरूण मिळाले. विकीने एकीला पिझ्झाचे गिफ्ट कार्ड दिले. आता ही झाली सिक्रेट सांता देवाण घेवाण. पण ख्रिसमस च्या निमित्ताने काहीजणी एकमेकींना अश्याच काही भेट वस्तू देतात. त्यात असेच काही उपयुक्त वस्तू असतात आणि काही चॉकलेटेही असतात.
विकीने मला यावर्षी पॉपकार्नची बॅग दिली की जी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवल्यावर पॉपकॉर्न तयार होतात टणटण उड्या मारत. शिवाय दोन तीन प्रकारची चॉकलेटे आणि कोकोआ मिक्स दिले. तर या ज्या भेटवस्तू देतात ना त्या सजलेल्या पिशव्याच जास्त छान असतात ! मी मागच्याच्या मागच्या वर्षी चॉकलेटे दिले. आणि मागच्या वर्षी लोंबते कानातले दिले. सर्वजणी खूप खुष होत्या. २ वर्षापुर्वीच्या भारतभेटी मध्ये मी तुळशी बागेतून सगळ्यांना कानातले खरेदी केले. सर्वांना आवडले. यावर्षी माझ्या मनात नेकलेस द्यायचे होते पण बाहेर जायला अजिबातच जमले नाही. आता मी पुढील वर्षी छोट्या सजवलेल्या पिशव्यांमधून एक लिपस्टिक, एक नेलपॉलिश व चॉकलेटे देणार आहे.
विकी व कार्मेन ला मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पण काहीतरी देते. एकदा कार्मेनला चॉकलेटे दिली.एकदा कानातले दिले. विकीला एकदा एक कप केक आणि फुगा दिला. आता यावर्षी मी दोघींना भारतातला गुलमोहोर प्रिंट करून आणि तो फ्रेम मध्ये घालून देणार आहे असा विचार आहे. :)
यावरून मला एक कल्पना सुचली. आपल्याकडे सिक्रेट संक्रांती करता येईल
:)
तीळगुळाबरोबर भेटवस्तू अर्थात ऑफीस मध्ये. संक्रांतीचे हळदी कुंकू ज्या
बायका घरी करतात त्यात ज्या लुटायच्या वस्तू देतात तर काही बायका चिठ्ठ्या
ठेवतात आणि मग त्या चिठ्ठीत जी वस्तू येईल ती त्या बाईला मिळते. असे आपल्याकडेही आहेच की !!! :) :)

विकीला के कडून भेटवस्तू मिळाली ती म्हणजे कानातले आणि काचेची एक बाहूली. खूप छान होती. पिझ्झा बार मध्ये एक मेक्सिको देशातली मुलगी आहे तिला मोठा मेक अप बॉक्स मिळाला. हा बॉक्स तिला बेकरी मध्ये काम करणाऱ्या मुलीकडून मिळाला. मेक अप बॉक्स मिळाल्यावर ती खूपच खुष झाली होती. ती रोज चेहऱ्याला काय काय लावून येते. काजळ, लाली, डोळे वाढवते. पापणीच्या वर रंग लावते. त्या रंगांमध्ये चमचम पण असते. तिला ते खूप छान दिसते. एकीला प्रोड्युस मधल्या मॅजेजर कडून एक उबदार पांघरूण मिळाले. विकीने एकीला पिझ्झाचे गिफ्ट कार्ड दिले. आता ही झाली सिक्रेट सांता देवाण घेवाण. पण ख्रिसमस च्या निमित्ताने काहीजणी एकमेकींना अश्याच काही भेट वस्तू देतात. त्यात असेच काही उपयुक्त वस्तू असतात आणि काही चॉकलेटेही असतात.
विकीने मला यावर्षी पॉपकार्नची बॅग दिली की जी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवल्यावर पॉपकॉर्न तयार होतात टणटण उड्या मारत. शिवाय दोन तीन प्रकारची चॉकलेटे आणि कोकोआ मिक्स दिले. तर या ज्या भेटवस्तू देतात ना त्या सजलेल्या पिशव्याच जास्त छान असतात ! मी मागच्याच्या मागच्या वर्षी चॉकलेटे दिले. आणि मागच्या वर्षी लोंबते कानातले दिले. सर्वजणी खूप खुष होत्या. २ वर्षापुर्वीच्या भारतभेटी मध्ये मी तुळशी बागेतून सगळ्यांना कानातले खरेदी केले. सर्वांना आवडले. यावर्षी माझ्या मनात नेकलेस द्यायचे होते पण बाहेर जायला अजिबातच जमले नाही. आता मी पुढील वर्षी छोट्या सजवलेल्या पिशव्यांमधून एक लिपस्टिक, एक नेलपॉलिश व चॉकलेटे देणार आहे.
विकी व कार्मेन ला मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पण काहीतरी देते. एकदा कार्मेनला चॉकलेटे दिली.एकदा कानातले दिले. विकीला एकदा एक कप केक आणि फुगा दिला. आता यावर्षी मी दोघींना भारतातला गुलमोहोर प्रिंट करून आणि तो फ्रेम मध्ये घालून देणार आहे असा विचार आहे. :)
यावरून मला एक कल्पना सुचली. आपल्याकडे सिक्रेट संक्रांती करता येईल

Thursday, December 07, 2017
पोलीसीखाक्या
आमची कार महामार्ग ४० वरून खूप जोरात धावत होती. डीसीवरून निघालो होतो.
महामार्ग ९५ हा आम्हाला खूप आवडतो. या रस्त्यावर खूप शिस्तीत वाहतूक चालते.
निघायला उशीर झाला होता. थंडीचे दिवस होते त्यामुळे ५ ला निघतानाच अंधार
झाला होता. एकापाठोपाठ एक अश्या कार टेकलेल्या होत्या. तरीही कुठेही वाहतुक मुरंबा झाला नाही. सर्वजण ठरवून दिलेल्या वेगानेच जात होते. आमच्या प्रवासाला ५ तास उलटून गेले होते आणि केव्हा एकदा घरी पोहोचत आहोत असे होऊन गेले होते. विल्मिंग्टनला येण्यासाठी महामार्ग ४० घ्यावा लागतो
आणि त्यावर लागणारी मोठी शहरे ओलांडली की विल्मिंग्टनला जाण्यासाठीचा हा रस्ता एकदम ओसाड होतो. वाहतूक खूपच तुरळक होते. विल्मिंग्टन -( नॉर्थ कॅरोलायना ) शहरात हा महामार्ग संपतो. तसा तर हा महामार्ग ईस्ट आणि वेस्ट कोस्टला जोडणारा प्रचंड मोठा आहे. नॉर्थ कॅरोलायना मधून सुरूहोतो ते कॅलिफोर्नियात संपतो.
पोसीस लगेचच निघून गेले आणि मी लगेचच विनायकला विचारले "काय रे झाले होते? " विनायक म्हणाला अग काही नाही गं. आपल्या कारचा वेग खूपच वाढला होता. १०० एमपिएचच्या वर गेला होता. पोलिसांनी विचारले की इतक्या वेगात का जात होतात? तर विनायकने त्यांना सांगितले की आम्ही डीसीवरून निघालो आहोत. खूप दमलो आहोत आणि कधी एकदा घरी जाऊन पोहोचतो य असे आम्हाला झाले आहे. आणि रस्ताही रिकामा आहे. त्यावर पोलीस म्हणाला "तुमचा जी व तुम्हाला प्यारा आहे ना? " मग लक्षात ठेवा. ठरवून दिलेली वेगमर्यादा
पाळत जा. इथे ड्रग घेऊन जाणारे आणि दारू पिऊन चालवणारे बरेच जण असतात. तुमच्या कारचा वेग वाढला आणि अचानक एखादी कार तुमच्या मागे येऊन तुमच्याशी स्पर्धा करायला लागली तर तुम्ही तुमच्या वेगाचा ताबा नीट करू शकणार नाही. नीट लक्षात ठेवा. आमचे नशीब आम्हाला सक्त ताकीदच मिळाली. तिकीट दिले नाही. पोलीसांचे म्हणणे खरे होते. बोलताबोलता कारचा वेग इतका वाढला होता ते आमच्या लक्षातच आले नाही.
आणि त्यावर लागणारी मोठी शहरे ओलांडली की विल्मिंग्टनला जाण्यासाठीचा हा रस्ता एकदम ओसाड होतो. वाहतूक खूपच तुरळक होते. विल्मिंग्टन -( नॉर्थ कॅरोलायना ) शहरात हा महामार्ग संपतो. तसा तर हा महामार्ग ईस्ट आणि वेस्ट कोस्टला जोडणारा प्रचंड मोठा आहे. नॉर्थ कॅरोलायना मधून सुरूहोतो ते कॅलिफोर्नियात संपतो.
विल्मिंग्टन शहर जिथे आम्ही पूर्वी राहत होतो तिथे समुद्रकिनारे आहेत पण
ते इतके काही फेमस नाहीयेत त्यामुळे या शहरी कोणीही येत नाही.
तर
रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. डाव्या बाजूच्या लेनवरून आमची कार जात होती.
एकीकडे आमच्या गप्पा चालू होत्या. तेव्हड्यात मला वीज चमकल्यासारखे वाटले.
मी म्हणाले पण विनायकला की वीज चमकली. पाऊस येणार की काय? पण वातावरण तर तसे दिसत नाहीये. हे मी म्हणा यला आणि विनायकने अतिमंद वेग करत करत कार रस्त्याच्या डाव्या बाजूला घ्यायला एकच गा ठ पडली. विनायक म्हणाला " वीज चमकत नाहीये. मागे बघ. पो लीस आहेत" मि पण मागे वळून पाहि ले तर पोलीसची गाडी आमचा पाठलाग करत होती. माझ्या पोटात खूप मोठ्ठा गोळा आला. मी म्हणाले काय झाले? आपले काय चुकले? माझ्या डोळ्यासमोर तर मी व वि कारागृहात आहोत असे चित्र तरळले. :D विनायक म्हणाला मला पण माहीती नाहीये काय झाले ते. आणि आता तू पोलिसांच्या समोर बडबड करू नकोस. गप्प रहा. :D तसा तर विनायकचा चेहराही पडला होता. आम्हाला पोलीसांनी पकडले असे आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होते. विनायकने
कार बाजूला घेउन थांबवली व कारच्या बाहेर आला. मी पण बाहेर येऊका? अश्या प्रश् नार्थक नजरेने सीट बेल्ट काढत होते. पोलीस म्हणाले "नको" तू जागेवरच बस. कारचे दार लावले. पोलीस आणि विनायक काही तरी बोलत होते. माझ्या चेहऱ्या वर "काय बोलतायत एवढे? काहीही झालेले नसूदे" असे भाव चेहऱ्यावर होते.
१ ते २ मिनिटांनी विनायक कार मध्ये येऊन बसला. पोलिसांशी विनायकने
हस्तादोंलन केलेले दिसले. आणि माझा जीव भांड्यात पडला.
कार बाजूला घेउन थांबवली व कारच्या बाहेर आला.
पोसीस लगेचच निघून गेले आणि मी लगेचच विनायकला विचारले "काय रे झाले होते? " विनायक म्हणाला अग काही नाही गं. आपल्या कारचा वेग खूपच वाढला होता. १०० एमपिएचच्या वर गेला होता. पोलिसांनी विचारले की इतक्या वेगात का जात होतात? तर विनायकने त्यांना सांगितले की आम्ही डीसीवरून निघालो आहोत. खूप दमलो आहोत आणि कधी एकदा घरी जाऊन पोहोचतो
पाळत जा. इथे ड्रग घेऊन जाणारे आणि दारू पिऊन चालवणारे बरेच जण असतात. तुमच्या कारचा वेग वाढला आणि अचानक एखादी कार तुमच्या मागे येऊन तुमच्याशी स्पर्धा करायला लागली तर तुम्ही तुमच्या वेगाचा ताबा नीट करू शकणार नाही. नीट लक्षात ठेवा. आमचे नशीब आम्हाला सक्त ताकीदच मिळाली. तिकीट दिले नाही. पोलीसांचे म्हणणे खरे होते. बोलताबोलता कारचा वेग इतका वाढला होता ते आमच्या लक्षातच आले नाही.
महामार्गावर जास्तीची लिमिट ७० असते. तुम्ही फार फार तर ८० ने जाऊ शकता. पण १०० च्या
वर वेग गेला? बापरे ! लक्षात ठेवायला पाहिजे. विनायक उत्तम कारचालक आहे. १७ वर्षात फक्त २ छोटे अपघात झाले आहेत. पण त्यावरून बरीच माहीती कळाली. पहिल्या अपघाताचा अनुभव दुसऱ्या अपघाताच्या कामी आला. अपघाताचा अनुभव कसा, कुठे, कधी आणि त्यासाठी काय का य
करावे लागते आणि समजते ते पुढील लेखात बघू. :)
वर वेग गेला? बापरे ! लक्षात ठेवायला पाहिजे. विनायक उत्तम कारचालक आहे. १७ वर्षात फक्त २ छोटे अपघात झाले आहेत. पण त्यावरून बरीच माहीती कळाली. पहिल्या अपघाताचा अनुभव
करावे लागते आणि समजते ते पुढील लेखात बघू. :)
Saturday, November 25, 2017
भारतभेट २०१७
जेव्हा
सईचे लग्न ठरले त्या दिवसापासून मी आईशी आणि बहिणीशी फोनवर लग्नाविषयीच
गप्पा मारत होते. कोणती साडी कोणत्या वेळेला नेसायची, लग्नाची खरेदी झाली
का ,, केळवणे कोणाकडे झाली, इ. इ. ते अगदी मी आईच्या घरी येईपर्यंत. आईच्या
घरी आलो आणि एकेक दिवस अगदी लागलेले होते. आईकडे सई आणि रंजना आदल्या
दिवशीच आल्या होत्या. घरी गेल्यागेल्या गप्पांबरोबर आलं घातलेला चहा
रंजनाने केला आणि त्यानंतर मनसोक्त पोहे खाल्ले रंजनाने केलेले आणि गुडुप
झोपी गेलो. विनय विदुला आईकडे कधी येऊन पोहोचले कळले देखिल नाही. उठल्यावर
अंघोळी उरकून लगेचच जेवायला बसलो. विनयने रंजनाला लग्नाचे केळवण केले होते
त्यात आमची पण हजेरी लागली होती. चविष्ट आणि छान जेवण होते.
शेवभाजी,,बटाटेवडे, चिरोटे, सोलकढी, पुलाव, इ. इ. अहेराची देवाणघेवाण झाली.
त्यात माझाही नंबर लागला आणि विनयने मला घेतलेले ड्रेस चे कापड खूप आवडून
गेले.
लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या अहेराची खरेदी केली. मी आईला आणि रंजनाला साड्या घेतल्या. गलानी दुकानात गेल्यावर साड्या बघत होतो. पहिली जरीची साडी दाखवली तीच खरे तर आवडून गेली होती पण अजून काही साड्यांचे प्रकार दाखवता का ? असे दुकानदाराला सांगितल्यावर त्याने लगेचच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि त्यातले वेगवेगळे रंग दाखवले. पिवळा, निळा, लाल, आकाशी, नारिंगी,,, पण आईच्या साड्यांचे अनेक रंग झाले होते. अबोली रंग झाला नव्हता. माझ्या मनात हाच रंग साडीचा घ्यायचा होता. तो नेमका नव्हता. गडद पोपटी रंग आईच्या साडीचा घेतला त्याला जांभळ्या रंगाचे काठ होते. हा रंग झालेला नव्हता. साडी अप्रतिम होती. नंतर लगेच रंजनाची साडी घेतली. डिझाईनर साड्यांचे बरेच प्रकार पाहिले. आणि त्यात एक सुंदर साडी लगेचच आवडून गेली. साडीचा रंग म्हणजे लाल रंगामध्ये गुलाबी रंगाचे मिश्रण होते. "हिच साडी" मी सई रंजना आणि सुरेशचे एक मत झाले. रंजनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
तिसऱ्या दिवशी आमच्या तिघींची केशरचना कशी करायची? याची एक ट्रायल घेतली. पार्लरवाली आमची मैत्रिणच असल्याने तिच्या पार्लर मध्ये रिलॅक्स बसलो होतो. एकीकडे गप्पा चालू होत्या. योगिताने पटकन केशरचना केली आणी ती आम्हाला आवडली सुद्धा. मला वाटले होते की अंबाडा घालताना केसांमध्ये एक मोठ्ठा बॉल घालतील आणि त्यावर केस वळवून घेतील. मी आधी साशंक होते. माझे केस सुळसुळीत असल्याने केसात घातलेला बॉल मध्ये वाटेत पडला तर?
:D
पण तसे काहीही नव्हते त्यामुळे शंकेचे निरसन लगेचच झाले. माझी, रंजनाची व
सईची सीमांत पूजनासाठी आणि दुसऱ्या दिवशीचीही केशरचना ठरवली गेली.
२ नोव्हेंबरला घरचे केळवण झाले. मोजून ४ प्रकारच केले. कारण की लग्नघरातले सदस्य केळवणे खाऊन खाऊन थकली होती. गोड म्हणून मोदक केले. आवडीचे म्हणून बटाटेवडे केले. आणि मिसळ, काकडी, टोमॅटो व कांद्याचे काप. योगायोग छान होता. केळवण्याच्याच दिवशी सईचा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री चॉकलेट केक, सईला आम्ही तिघींनी औक्षण केले. फोटोसेशन झाले. एकेक दिवस बिझी बिझी... नंतर एकापाठोपाठ एकेक म्हणजे रंजनाला केळवणाला आलेला अहेर आणि तिने देण्याकरता आणलेला अहेर बघितला. नंतर एके दिवशी घरच्या शुभ कार्याच्या करंज्या केल्या. करंज्या करताना खूपच हासलो. एके दिवशी ग्रहमख आणि नंतर हॉल मध्ये जेवण , बांगड्या आणि मेंदी करता रंजनाचे घर नुसते भरून गेले होते. दुपारपासून ते रात्री १० पर्यंत मेंदी काढणाऱ्या मुली बसल्या होत्या. एकेकीच्या हातावर मेंदी काढली जात होती. बांगड्या भरल्या जात होत्या. प्रत्येकीचे हात हिरव्या बांगड्यांनी छान सजले होते. रात्री मुगाच्या डाळीची खिचडी झाली. मी २ ओळीचे गाणे म्हणले. " मनभावन के घर जाए गौरी घुंघट में शरमाए गौरी, बंधी रहे ये प्यार की डोरी हमें ना भूलाना" मी रंजना आणि सईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले.
या सर्व दिवसांच्या मध्ये एकदा आईच्या मैत्रिणींनी खूप छान केळवण केले. एका ग्रुपने इडली सांबार, गोडाचा शिरा आणि चटणी, एका ग्रूपने ढोकळा, आप्पे, चटणी, चिरोटे आणि नंतर अमूलचे आईसक्रीम. छान डिझाइन च्या पर्सेस दिल्या. मला हे सर्व अनुभवताना खूपच छान वाटत होते. अशी मजा अमेरिकेत नाही. लग्न झाल्यानंतर एके दिवशी मला भेटायला भाग्यश्री आणि सविता आईकडे आल्या आणि आम्ही नैवेद्यम मध्ये जेवायला गेलो. सविताचे ऑफीस आईच्या घराच्या जवळ होते म्हणून हे शक्य झाले. आम्ही लहानपणच्या मैत्रिणी जवळ जवळ ३५ वर्षांनी भेटलो. इतकी वर्षे मध्ये गेली असे जरासुद्धा जाणवत नव्हते. त्याच निरागस गप्पा होत्या.
श्रुती मंगल कार्यालयात जमले सर्वजण. नंतर योगिताने आमच्या तिघींचा मेक अप केला आणि छान केशरचना केली. आमच्या हातात आमच्या मामे बहिणींनी पोहे दिले, पाणी दिले , चहा दिला. सर्वजणी आमच्या तिघींचे कौतुक करत होत्या. बहिणी बहिणींचे प्रेम असेच असते निरागस. आमच्या वहिन्या पण खूप छान आहेत आमच्यात मिक्स होणाऱ्या. एकाच मांडवात मला समस्त नातेवाईक भेटत होते.
आदल्या दिवशी मुलाकडची मंडळी सोलापूरवरून आली. बस ४० जणांची होती. नवऱ्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना कार मध्ये बसवून घेऊन आले आणि माझ्या बहिणीने त्यांना औक्षण केले. त्यांच्यासाठी गुलाबफुलांच्या पायघड्या सर्व भाचे कंपनीने मिळून तयार केल्या होत्या. पायघड्यावरून सर्व मुलाकडची मंडळी चालत आली. त्यांच्यावर आम्ही सगळ्यांनी फुलांच्या पाकळ्या उधळल्या. स्वागत खूपच छान झाले. सीमांतपूजन झाल्यावर गाण्याचा कार्यक्रम झाला. अर्थात वेळेअभावी तो तासाच्या आतच संपवावा लागला. मोजकीच आणि प्रसंगानुरूप गाणी खूप छान गात होते. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, फुलले रे क्षण माझे फुलले रे, तेरे मेरे मिलन की ये रैना, मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू,, आणि शेवटचे गाणे होते मेहेंदी लगाके रखना, डोली सजाके रखना,,, यात सई, सुजीत, नवऱ्या मुलीचे व नवऱ्या मुलाचे आईवडील नाचले. अगदी थोडक्यात पण हा गाण्याचा कार्यक्रम खूपच छान झाला. कार्यक्रम संपल्यावर जेवणे. जेवणात कढी, रस्सा, गोडाचा शिरा, पुरी,इ. इ् होते.
सईबरोबर आम्ही दोघी बहिणी पण नटलो. सईचा तसा आग्रह होता. आमचे नवरे म्हणालेच "कोणाचे लग्न आहे ? तुमचे की सईचे? काय एवढ्या नटताय? आम्ही दोघीही काही कमी नाही बोलायला. आम्ही म्हणालो सई बरोबर आम्ही पण लग्न करणार आहोत. मी म्हणाले मांडवात जो कोणी चांगला दिसेल त्याला आम्ही माळ घालू.
:D
:D.
"काय करायचे ते करा" इति आईचे जावई. लग्नाच्या दिवशी लग्नघटिका जवळ जवळ
येत होती. आधी सगळे विधी असल्याने ते शांतपणे बघायला मिळाले. एकीकडे
नातेवाईकांबरोबर गप्पाटप्पा होत होत्या. सईची आजी खूपच उत्साही होती.
तिच्या मैत्रिणी आल्यावर लगेच त्यांच्या घोळक्यात शिरली. ठरवलेल्या
मुहूर्तावर "शुभमंगल सावधान" झाले आणि सई सुजीत विवाहबद्ध झाले. फोटोज आणि
विडिओज चालूच होते, अगदी आदल्या दिवशी सुरवात झाली ते सई सासरी
निघेपर्यंत. आम्ही खूप रडलो. अर्थातच. घरी आल्यावर शांत शांत जाणवत होते.
घाईगडबड संपली होती. दुसऱ्या दिवशी रंजना सुरेश सोलापूरला रवाना झाले ते
मुलीच्या सासरच्या घरी. तिथे रिसेप्शन आणि पूजा होती.
सई सासरी गेली तशी माझ्याही बॅगांची आवरा आवर सुरू झाली. आईचे घर मी परत निघाल्याने आणि रंजनाचे घर सई सासरी गेल्याने रिकामे होत होते. मि निघायच्या आधी सई - सुजीतही पुण्यावरून ठाण्यास जायला निघाले ते त्यांच्या घरात जाण्यासाठी. नवीन संसार मांडायला सासुसासरे आले होते. सई सुजीत खुप गोड दिसत होते. आम्ही दोघे डोंबिवलीत आलो खरे पण अगदी आदल्या दिवशी रात्री. दुसऱ्या दिवशी सोसायटीची एक महत्त्वाची मिटींगला हजर रहायचे होते. दिवस उजाडला मात्र ! वेळ इतका झरझर सरला की विमानतळावर जाण्यासाठी वेळ येऊन ठेपली. आमच्या सोसायटीत शैलाताई - खाडीलकर आणि सुषमा - नेर्लेकर यांना भेटलो. शैलाताईंनी मला त्यांच्या हाताने विणलेली टोपी आणि मफलर दिला भेट म्हणून. दर भेटीत त्या काही ना काही छान भेटवस्तू देतात. सुषमाने मला एअरटाईट डबे दिले. ओलाची टॅक्सी शैलाताईंनी बुक करून दिली. त्यांना टाटा बाय बाय करत आम्ही टॅक्सीत बसलो ते विमानतळावर जाण्यासाठी. प्रत्येक भारतभेटीमध्ये एखादी मैत्रिण आणि एखादा नातेवाईक यांना भेटणे होते कारण की मी दर भारतभेटीत जास्तीत जास्त वेळ आईबाबांना देते. त्यामुळे आईबाबांना आणि मला खूप समाधान मिळते. मित्रमंडळींच्या यादीत बऱ्याच जणांना भेटलेली आहे. तरी सुद्धा बरेच जण बाकी आहेत. एक विचार घोळतोय. सर्वांना एकत्र मीच बोलावेन.
लवकरात लवकर जमवायला हवे हे खरेच !!
:)
पहिले पाऊल टाकिते मी
तुझ्यासवे ते विश्वासाने //१//
दुसरे पाऊल तुझ्यासंगती
तुझ्या नि माझ्या प्रेमाचे //२//
तिसऱ्या पाऊली सांगते तुज मी
वागवीन मी सर्वांनाच आदराने//३//
चवथे पाऊल टाकू दोघे मिळूनी
आप्तस्वकीयांच्या आशीर्वादाने //४//
पाचव्या पाऊली जागतील आशा
पूर्ण करूया मनोरे सुखस्वप्नांचे //५//
सहावे पाऊल असेल तुझे नि माझे
उजळतील दाही दिशा समाधानाने //६//
सातव्या पाऊली वचने देऊन
आपण राहू मैत्र सात जन्मांचे //७//
वरची सात पाऊले मला आपोआप सुचली ती रुखवतात होती.
लग्नमय भारतभेटीची कहाणी समाप्त
:)
:D
Rohini Gore
लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या अहेराची खरेदी केली. मी आईला आणि रंजनाला साड्या घेतल्या. गलानी दुकानात गेल्यावर साड्या बघत होतो. पहिली जरीची साडी दाखवली तीच खरे तर आवडून गेली होती पण अजून काही साड्यांचे प्रकार दाखवता का ? असे दुकानदाराला सांगितल्यावर त्याने लगेचच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि त्यातले वेगवेगळे रंग दाखवले. पिवळा, निळा, लाल, आकाशी, नारिंगी,,, पण आईच्या साड्यांचे अनेक रंग झाले होते. अबोली रंग झाला नव्हता. माझ्या मनात हाच रंग साडीचा घ्यायचा होता. तो नेमका नव्हता. गडद पोपटी रंग आईच्या साडीचा घेतला त्याला जांभळ्या रंगाचे काठ होते. हा रंग झालेला नव्हता. साडी अप्रतिम होती. नंतर लगेच रंजनाची साडी घेतली. डिझाईनर साड्यांचे बरेच प्रकार पाहिले. आणि त्यात एक सुंदर साडी लगेचच आवडून गेली. साडीचा रंग म्हणजे लाल रंगामध्ये गुलाबी रंगाचे मिश्रण होते. "हिच साडी" मी सई रंजना आणि सुरेशचे एक मत झाले. रंजनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
तिसऱ्या दिवशी आमच्या तिघींची केशरचना कशी करायची? याची एक ट्रायल घेतली. पार्लरवाली आमची मैत्रिणच असल्याने तिच्या पार्लर मध्ये रिलॅक्स बसलो होतो. एकीकडे गप्पा चालू होत्या. योगिताने पटकन केशरचना केली आणी ती आम्हाला आवडली सुद्धा. मला वाटले होते की अंबाडा घालताना केसांमध्ये एक मोठ्ठा बॉल घालतील आणि त्यावर केस वळवून घेतील. मी आधी साशंक होते. माझे केस सुळसुळीत असल्याने केसात घातलेला बॉल मध्ये वाटेत पडला तर?

२ नोव्हेंबरला घरचे केळवण झाले. मोजून ४ प्रकारच केले. कारण की लग्नघरातले सदस्य केळवणे खाऊन खाऊन थकली होती. गोड म्हणून मोदक केले. आवडीचे म्हणून बटाटेवडे केले. आणि मिसळ, काकडी, टोमॅटो व कांद्याचे काप. योगायोग छान होता. केळवण्याच्याच दिवशी सईचा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री चॉकलेट केक, सईला आम्ही तिघींनी औक्षण केले. फोटोसेशन झाले. एकेक दिवस बिझी बिझी... नंतर एकापाठोपाठ एकेक म्हणजे रंजनाला केळवणाला आलेला अहेर आणि तिने देण्याकरता आणलेला अहेर बघितला. नंतर एके दिवशी घरच्या शुभ कार्याच्या करंज्या केल्या. करंज्या करताना खूपच हासलो. एके दिवशी ग्रहमख आणि नंतर हॉल मध्ये जेवण , बांगड्या आणि मेंदी करता रंजनाचे घर नुसते भरून गेले होते. दुपारपासून ते रात्री १० पर्यंत मेंदी काढणाऱ्या मुली बसल्या होत्या. एकेकीच्या हातावर मेंदी काढली जात होती. बांगड्या भरल्या जात होत्या. प्रत्येकीचे हात हिरव्या बांगड्यांनी छान सजले होते. रात्री मुगाच्या डाळीची खिचडी झाली. मी २ ओळीचे गाणे म्हणले. " मनभावन के घर जाए गौरी घुंघट में शरमाए गौरी, बंधी रहे ये प्यार की डोरी हमें ना भूलाना" मी रंजना आणि सईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले.
या सर्व दिवसांच्या मध्ये एकदा आईच्या मैत्रिणींनी खूप छान केळवण केले. एका ग्रुपने इडली सांबार, गोडाचा शिरा आणि चटणी, एका ग्रूपने ढोकळा, आप्पे, चटणी, चिरोटे आणि नंतर अमूलचे आईसक्रीम. छान डिझाइन च्या पर्सेस दिल्या. मला हे सर्व अनुभवताना खूपच छान वाटत होते. अशी मजा अमेरिकेत नाही. लग्न झाल्यानंतर एके दिवशी मला भेटायला भाग्यश्री आणि सविता आईकडे आल्या आणि आम्ही नैवेद्यम मध्ये जेवायला गेलो. सविताचे ऑफीस आईच्या घराच्या जवळ होते म्हणून हे शक्य झाले. आम्ही लहानपणच्या मैत्रिणी जवळ जवळ ३५ वर्षांनी भेटलो. इतकी वर्षे मध्ये गेली असे जरासुद्धा जाणवत नव्हते. त्याच निरागस गप्पा होत्या.
श्रुती मंगल कार्यालयात जमले सर्वजण. नंतर योगिताने आमच्या तिघींचा मेक अप केला आणि छान केशरचना केली. आमच्या हातात आमच्या मामे बहिणींनी पोहे दिले, पाणी दिले , चहा दिला. सर्वजणी आमच्या तिघींचे कौतुक करत होत्या. बहिणी बहिणींचे प्रेम असेच असते निरागस. आमच्या वहिन्या पण खूप छान आहेत आमच्यात मिक्स होणाऱ्या. एकाच मांडवात मला समस्त नातेवाईक भेटत होते.
आदल्या दिवशी मुलाकडची मंडळी सोलापूरवरून आली. बस ४० जणांची होती. नवऱ्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना कार मध्ये बसवून घेऊन आले आणि माझ्या बहिणीने त्यांना औक्षण केले. त्यांच्यासाठी गुलाबफुलांच्या पायघड्या सर्व भाचे कंपनीने मिळून तयार केल्या होत्या. पायघड्यावरून सर्व मुलाकडची मंडळी चालत आली. त्यांच्यावर आम्ही सगळ्यांनी फुलांच्या पाकळ्या उधळल्या. स्वागत खूपच छान झाले. सीमांतपूजन झाल्यावर गाण्याचा कार्यक्रम झाला. अर्थात वेळेअभावी तो तासाच्या आतच संपवावा लागला. मोजकीच आणि प्रसंगानुरूप गाणी खूप छान गात होते. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, फुलले रे क्षण माझे फुलले रे, तेरे मेरे मिलन की ये रैना, मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू,, आणि शेवटचे गाणे होते मेहेंदी लगाके रखना, डोली सजाके रखना,,, यात सई, सुजीत, नवऱ्या मुलीचे व नवऱ्या मुलाचे आईवडील नाचले. अगदी थोडक्यात पण हा गाण्याचा कार्यक्रम खूपच छान झाला. कार्यक्रम संपल्यावर जेवणे. जेवणात कढी, रस्सा, गोडाचा शिरा, पुरी,इ. इ् होते.
सईबरोबर आम्ही दोघी बहिणी पण नटलो. सईचा तसा आग्रह होता. आमचे नवरे म्हणालेच "कोणाचे लग्न आहे ? तुमचे की सईचे? काय एवढ्या नटताय? आम्ही दोघीही काही कमी नाही बोलायला. आम्ही म्हणालो सई बरोबर आम्ही पण लग्न करणार आहोत. मी म्हणाले मांडवात जो कोणी चांगला दिसेल त्याला आम्ही माळ घालू.


सई सासरी गेली तशी माझ्याही बॅगांची आवरा आवर सुरू झाली. आईचे घर मी परत निघाल्याने आणि रंजनाचे घर सई सासरी गेल्याने रिकामे होत होते. मि निघायच्या आधी सई - सुजीतही पुण्यावरून ठाण्यास जायला निघाले ते त्यांच्या घरात जाण्यासाठी. नवीन संसार मांडायला सासुसासरे आले होते. सई सुजीत खुप गोड दिसत होते. आम्ही दोघे डोंबिवलीत आलो खरे पण अगदी आदल्या दिवशी रात्री. दुसऱ्या दिवशी सोसायटीची एक महत्त्वाची मिटींगला हजर रहायचे होते. दिवस उजाडला मात्र ! वेळ इतका झरझर सरला की विमानतळावर जाण्यासाठी वेळ येऊन ठेपली. आमच्या सोसायटीत शैलाताई - खाडीलकर आणि सुषमा - नेर्लेकर यांना भेटलो. शैलाताईंनी मला त्यांच्या हाताने विणलेली टोपी आणि मफलर दिला भेट म्हणून. दर भेटीत त्या काही ना काही छान भेटवस्तू देतात. सुषमाने मला एअरटाईट डबे दिले. ओलाची टॅक्सी शैलाताईंनी बुक करून दिली. त्यांना टाटा बाय बाय करत आम्ही टॅक्सीत बसलो ते विमानतळावर जाण्यासाठी. प्रत्येक भारतभेटीमध्ये एखादी मैत्रिण आणि एखादा नातेवाईक यांना भेटणे होते कारण की मी दर भारतभेटीत जास्तीत जास्त वेळ आईबाबांना देते. त्यामुळे आईबाबांना आणि मला खूप समाधान मिळते. मित्रमंडळींच्या यादीत बऱ्याच जणांना भेटलेली आहे. तरी सुद्धा बरेच जण बाकी आहेत. एक विचार घोळतोय. सर्वांना एकत्र मीच बोलावेन.
लवकरात लवकर जमवायला हवे हे खरेच !!

पहिले पाऊल टाकिते मी
तुझ्यासवे ते विश्वासाने //१//
दुसरे पाऊल तुझ्यासंगती
तुझ्या नि माझ्या प्रेमाचे //२//
तिसऱ्या पाऊली सांगते तुज मी
वागवीन मी सर्वांनाच आदराने//३//
चवथे पाऊल टाकू दोघे मिळूनी
आप्तस्वकीयांच्या आशीर्वादाने //४//
पाचव्या पाऊली जागतील आशा
पूर्ण करूया मनोरे सुखस्वप्नांचे //५//
सहावे पाऊल असेल तुझे नि माझे
उजळतील दाही दिशा समाधानाने //६//
सातव्या पाऊली वचने देऊन
आपण राहू मैत्र सात जन्मांचे //७//
वरची सात पाऊले मला आपोआप सुचली ती रुखवतात होती.
लग्नमय भारतभेटीची कहाणी समाप्त


Rohini Gore
Saturday, October 21, 2017
मी अनुभवलेली अमेरिका ...(८)
मुंबईत राहत असताना मी किराणामालाची यादी फोनवरून सांगायचे की २ तासात घरपोच सामान यायचे. तसेच वर्षभराचे तिखट, हळद आणि गोडा मसालाही घरी करण्याची सवय होती. दाणे भाजून त्याचे कूट करण्याची सवय होती. शिवाय ताजा नारळ खरवडून तो वापरायचीही सवय होती. इथे अगदी याच्या विरूद्ध आहे. किराणामाल म्हणजे तेल, साखर, चहा, डाळी आणि पिठे सर्वच्या सर्व आपण दुकानात जाऊन आणायला लागते. त्याकरता एक दुकान पुरत नाही. ३ ते ४ अमेरिकन स्टोअर्स फिरायला लागतात. डाळी, मसाले, पोहे, रवा आणि इतर याकरता भारतीय दुकानात जावे लागते आणि हे भारतीय दुकान प्रत्येक शहरात जवळ कधीच उपलब्ध नसते. अगदी क्वचित ठिकाणी असते जिथे भारतीयांची लोकसंख्या बरीच आहे ति शहरे. आम्हाला आतापर्यंत जवळच असलेले भारतीय दुकान नशिबी नव्हते. अगदी आता ज्या शहरात राहतो तिथपासून सुद्धा ते १ तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे. नेहमी लागणारा किराणामाल घाऊक प्रमाणात काही दुकानातून मिळतो जसे की तेल, साखर, दाणे, इ. इ. आणि बा कीचे किरकोळ काही आणायचे झाल्या स इतर काही ग्रोसरी स्टोअर्स असतात तिथे जावे लागते.
आता गोडा मसाला की जो मी वर्षाचा घरी करायचे त्याला पर्याय म्हणून मी काळा मसाला वापरू लागले. दाणे भाजून त्याचे कूट करण्यापेक्षा इथे भाजलेले दाणे मिळतात अर्थात ते खारट असतात. त्याचे कूट बनवायला लागले. घाऊक दुकानातून टुथपेस्ट, कपडे धुण्याकरता लागणारे डिटर्जंट, भांडी घासायला लागणारे लिक्विड, तसेच साबण, पेपर टॉवेल, टिश्यू पेपर इ. इ. घाऊक दुकानात मिळतात आणि ते स्वस्तही असतात. भाज्यांकरताही इथे ३ ते ४ दुकाने हिंडून भाज्या खरेदी करतो. उदा. हॅरिस्टीटर दुकानात शेपू चांगला मिळायचा. तसेच चिरलेला लाल भोपळाही मिळायचा. लोएस फूडच्या दुकानात पिण्याचे पाणी चांगले मिळायचे. इथले फ्रोजन फूड मी कधीच वापरले नाही. मला आवडत नाही. फक्त मटार आणि काही बीन्स आणते.
मुंबईत असताना माझा फ्रीज रिकामाच असायचा. उगीच नावाला २-४ भाज्या असायच्या. दुध खराब होऊ नये म्हणून आणि साय, लोणी असेच असायचे. इथे मिळणारे मीठविरहीत बटर वापरून मी तूप कढवायला लागले. स्वयंपाक करून जेवलो की उरलेले अन्न मी दुसऱ्या पातेलीत काढून ठेवते. ही सवय मात्र अजून बदललेली नाही. त्यामुळे खरे तर भांडी खूप पडतात. पाणी पिण्याचे ग्लासही मी घासते. भांडी घासायला कमी पडावीत म्हणून काही मैत्रिणी जशीच्या तशी पातेली फ्रीज मध्ये ठेवतात. म्हणजे फ्रीजमध्ये कूकर - कढया - पॅन्स असतात. आम्ही सकाळी वर्षानुवर्षे दुधेच पितो त्यामुळे सकाळची न्याहरी बनवायची सवय नव्हती. अर्थात इथे दुधामध्ये प्रोटीन पावडरी टाकून दुधे पितो. याचा फायदा खूपच झाला. शाकाहारी असल्याने खाण्यापिण्याच्या सवयी अजिबातच बदललेया नाहीत. म्हणजे सगळे अन्न ताजे करून खायचे आणि त्यातूनही पोळी, भाजी, भात, आमटी, पोहे, उपमे, बनवून खाण्याचे बदललेले नाही. इथली सर्व प्रकारच्या उपहारगृहात गेलो आणि चव चाखली. इटालियन, मेक्सिकन, चायनीज, पण तितकी चव आवडली नाही. आणि भारतीय
उपहारगृहात सुद्धा मसालेदार चव कधीच नसते. त्यामुळे आवडणारे सर्व चमचमीत पदार्थ घरी
करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. बटाटेवडे, सामोसे, साबुदाणा खिचडी, साबुदाणे वडे, इडली सांबार, मसाला डोसा, भेळ, रगडा पॅटीस हे सर्व पदार्थ इथे घरी केले तरच खायला मिळतात
अन्यथा नाही. इथे मिळणाऱ्या भाज्या आणि फळे मोठमोठाली असल्याने चवीला अजिबा तच चांगली नाहीत.
शिवाय भारतीय भाज्याही सहज उपलब्ध नसल्याने त्याही खायला मिळाल्या नाहीत. जसे चमचमीत पदार्थही सहज उपलब्ध होत नाही जसे की वडा पाव तसेच गोड पदार्थही सहज उबलब्ध नसतात जसे की आयती पुरणपोळी, बासुंदी, गुलाबजाम, सुरळीच्या वड्या, अळूच्या वड्या इ. इ. फक्त आणिफक्त जिथे भारतीय वस्ती आहे तिथल्या शहरातच भारतीय काही लोकांची दुकाने आणि उपहारगृहे असतात. अमेरिका देश हा भारतापेक्षा
तिप्प्ट मोठा असल्याने आणि काही ठिकाणी भारतीय खूप कमी असल्याने कोणत्याही गोष्टी सहज उपलब्ध होत नाहीत
आता गोडा मसाला की जो मी वर्षाचा घरी करायचे त्याला पर्याय म्हणून मी काळा मसाला वापरू लागले. दाणे भाजून त्याचे कूट करण्यापेक्षा इथे भाजलेले दाणे मिळतात अर्थात ते खारट असतात. त्याचे कूट बनवायला लागले. घाऊक दुकानातून टुथपेस्ट, कपडे धुण्याकरता लागणारे डिटर्जंट, भांडी घासायला लागणारे लिक्विड, तसेच साबण, पेपर टॉवेल, टिश्यू पेपर इ. इ. घाऊक दुकानात मिळतात आणि ते स्वस्तही असतात. भाज्यांकरताही इथे ३ ते ४ दुकाने हिंडून भाज्या खरेदी करतो. उदा. हॅरिस्टीटर दुकानात शेपू चांगला मिळायचा. तसेच चिरलेला लाल भोपळाही मिळायचा. लोएस फूडच्या दुकानात पिण्याचे पाणी चांगले मिळायचे. इथले फ्रोजन फूड मी कधीच वापरले नाही. मला आवडत नाही. फक्त मटार आणि काही बीन्स आणते.
मुंबईत असताना माझा फ्रीज रिकामाच असायचा. उगीच नावाला २-४ भाज्या असायच्या. दुध खराब होऊ नये म्हणून आणि साय, लोणी असेच असायचे. इथे मिळणारे मीठविरहीत बटर वापरून मी तूप कढवायला लागले. स्वयंपाक करून जेवलो की उरलेले अन्न मी दुसऱ्या पातेलीत काढून ठेवते. ही सवय मात्र अजून बदललेली नाही. त्यामुळे खरे तर भांडी खूप पडतात. पाणी पिण्याचे ग्लासही मी घासते. भांडी घासायला कमी पडावीत म्हणून काही मैत्रिणी जशीच्या तशी पातेली फ्रीज मध्ये ठेवतात. म्हणजे फ्रीजमध्ये कूकर - कढया - पॅन्स असतात. आम्ही सकाळी वर्षानुवर्षे दुधेच पितो त्यामुळे सकाळची न्याहरी बनवायची सवय नव्हती. अर्थात इथे दुधामध्ये प्रोटीन पावडरी टाकून दुधे पितो. याचा फायदा खूपच झाला. शाकाहारी असल्याने खाण्यापिण्याच्या सवयी अजिबातच बदललेया नाहीत. म्हणजे सगळे अन्न ताजे करून खायचे आणि त्यातूनही पोळी, भाजी, भात, आमटी, पोहे, उपमे, बनवून खाण्याचे बदललेले नाही. इथली सर्व प्रकारच्या उपहारगृहात गेलो आणि
उपहारगृहात सुद्धा मसालेदार चव
करण्यावाचून गत्यंतर उरले नाही.
अन्यथा नाही. इथे मिळणाऱ्या भाज्या आणि फळे
शिवाय भारतीय भाज्याही सहज उपलब्ध नसल्याने त्याही खायला मिळाल्या नाहीत. जसे चमचमीत पदार्थही सहज उपलब्ध होत नाही जसे की वडा पाव तसेच गोड पदार्थही सहज उबलब्ध नसतात जसे की आयती पुरणपोळी, बासुंदी, गुलाबजाम, सुरळीच्या वड्या, अळूच्या वड्या इ. इ. फक्त आणिफक्त जिथे भारतीय वस्ती आहे तिथल्या शहरातच भारतीय काही लोकांची दुकाने आणि उपहारगृहे असतात. अमेरिका देश हा भारतापेक्षा
तिप्प्ट मोठा असल्याने आणि काही ठिकाणी भारतीय खूप कमी असल्याने कोणत्याही गोष्टी सहज उपलब्ध होत नाहीत
Friday, October 20, 2017
मी अनुभवलेली अमेरिका ... (7)
मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा आमच्या लग्नाला एक तप पूर्ण झाले होते. काही वर्षे नोकरी केली पण गृहीणी म्हणून माझी खरी ओळख आहे. स्वयंपाक नामक जी चीज असते ती मी इथे अनुभवताना माझी सुरवातीला खूप चिडचिड झाली. इथे आल्यावर इलेक्ट्रीक शेगड्या बघितल्यावर माझे डोकेच फिरले. मला गॅसवर स्वयंपाक करायला खूप आवडतो. दुधं तापवायची सवय होती त्यामुळे मी कॅनमधले दूध आधी पातेल्यात ओतले आणि तापत ठेवले. गार झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवले. साय विरजण्यासाठी दुपारी दुध बाहेर काढले पण सायीचा थर काही दिसेना. अगदी थोडासा पातळ पापुद्रा पसरला होता दुधावर. ४ पर्सेंट फॅटवाल्या दुधावर कशी काय साय धरणार? मला वारणा आणि गोकुळ दुधाची सवय होती. दाट दूध. चहामध्ये अगदी थोडे घातले तरी पुरते. तिथल्या आणि इथल्या चहाची धुंदी वेगवेगळी. इथल्या चहाची धुंदी मला कधी आलीच नाही. पारंपारिक चहा करण्याची सवय इथे पार मोडून गेली. दुपारी मी चहाच्या ऐवजी कोक प्यायला लागले. सुरवातीला टी-बॅग्ज कापून त्यातली चहाची भुकटी घालून चहा बनवायचे. नंतर एका मैत्रिणीकडून कळाले की मायक्रोवेव्ह मध्ये चहा बनवता येतो. तसे करून बघितले आणि दुध पाणी आणि चहाचे प्रमाण ठरवून ते निश्चित केले आणि पारंपारिक चहा बनवण्याच्या पद्धतीला काट मारून टाकली. एकतर इलेक्ट्रिक शेगड्या पटकन तापत नाहीत. त्यामुळे
चहा बनवताना आच तीव्र ठेवायला लागायची त्यामुळे चहाच्या पातेल्याची बुडे काळी पडायला लागली आणि मग ती घासून घासून कंबरडेमोडायला लागले. जाड साय नाही म्हणजे सायीचे दही नाही, लोणी नाही. घरचे कढवलेले तूपही नाही. ही सर्व कामे इथे आल्यावर बाद झाली.
सुरवातीला मी दही भारतासारखेच घरी बनवायचे. दही लावण्याकरता विरजण मी प्रविणा कडून आणले होते. प्रविणा माझ्यासारखीच दही-दूध प्रेमी बघून मला खुप आनंद झाला होता. नंतर दह्याचे डबे आणू लागलो. अर्थात घरचे दही ते घरचे दही. भारतात असताना उसने मी कधी घेतले नव्हते कुणाकडून पण अगदी क्वचित वेळ आलीच आणि शेजारणीकडे मागितले तर नेमके ते त्यावेळी तिच्याकडे नसायचेच. इथे आल्यावर प्रविणा माझ्याकडून उसने घ्यायची. कांदा, बटाटा वगैरे. उसने घेणे आणि ते आठवणीने परत करणे हाही प्रकार बाद झाला इथे आल्यावर. उरलेल्या अन्नाचे काय करायचे? इथे कामवाल्या बायका येत नसल्यानेते कधीतरी त्यांना क्वचित देण्याचाही प्रकार घडला नाही. तसे तर लग्न झाल्यावर मुंबई मध्ये आल्यावर आणि दोघंच दोघे असल्यावर
जेव्हढ्याच तेवढे बनवण्याची सवय असल्याने उरलेल्या अन्नाचे काय करायचे याचा फारसा त्रास झाला नाही. आपण बनवलेला पदार्थमैत्रिणीच्या घरी वाडग्यातून नेवून देणे आणि तिच्याकडला वाडग्यातून आलेला पदार्थ आपणही चवीने खाणे हे मात्र मी खूप छान अनुभवले इथे. आमच्या तिघींचा ग्रुप होता. माझ्याकडून काय येतयं याची वाट बघायच्या मैत्रिणी. त्यांच्याकडूनही रसम, सांबारंम, लेमन राईस आणि पुलीहोरा असे वेगवेगळे पदार्थ माहीती झाले. आपल्याकडची साबुदाणा खिचडी, बटाटेवडे यांची चवही त्यांना आवडली. हळूहळू काळ जसा पुढेपुढे सरकत गेला तसतसे सर्वच्या सर्व कामे आपली आपणच करायची सवय लागून गेली.
भारतातल्या सगळ्या सवयी मोडून गेल्या. जसे की....
-दुधासाठी पिशवी दारात अडकवली की त्यात दुधाच्या पिशव्या पडलेल्या असतात.
-दार उघडले की पेपर दारातच असतो.
- केराचा डबा बाहेर ठेवलेला असतो तो कचराही केरवाला घेऊन गेलेला असतो.
-कामवाली बाई आली की धुणे, भांडी, केर, फरशी पुसणे
तीच करते. सर्व प्रकारची दळणे आणून देते.
Tuesday, October 10, 2017
इंगल्स मार्केट ... (६)
२०१४ साली माझा कॉलेजचा पहिला दिवस होता गणेश चतुर्थीच्या दिवशी, आणि
नोकरीचा पहिला दिवस होता २०१५ धनत्रयोदशीच्या दिवशी. नोकरीच्या पहिल्याच
दिवशी मला चिकन कापायला लागले की जे मी जन्मात पाहिले नव्हते. नोकरीच्या
दुसऱ्या दिवशी मला पोर्क पुलींग करायला लागले. ते पाहून मला डचमळायला लागले
आणि मी माझ्या सोबत काम करत असलेल्या मैत्रिणींना सांगितले की हे मला
जमणार नाही. तसेच हॅम सलाड करायलाही मला जमणार नाही कारण की ते पाहिल्यावर
मला पोटात डचमळते आणि उलटी होईल की काय असे वाटते. विकी आणि कार्मेन
म्हणाल्या काही हरकत नाही. हे २ पदार्थ आम्ही करू. चिकन कापण्यासाठी ज्या
ट्रे मध्ये ते ठेवलेले असते तो ट्रे इतका काही जड असतो की तो काढायला गेले
तर तो जागचा हालत देखील नाही. त्यामुळे तो जड ट्रे कार्मेन आणि विकी मला
आणून देतात. जश्या त्या मला समजून घेतात तशीच मी पण त्या दोघींना समजून
घेते. कार्ट मधून बाकीचे सामान आणायला लागते ते मीआणते. आणि शक्य तितकी मदत
करते. आमच्या तिघींच्यातही एक प्रकारचा समजूतदारपणा आहे. आणि आम्ही
एकमेकींची काळजीही घेतो.
कामावर गेल्यावर फ्लोअर चेक करून तिथे सँडविचेस आणि सलाड चे डबे ठेवून परत किती शिल्लक आहेत त्याप्रमाणे किती पदार्थ बनवायचे आहेत इथपासून ते मांस ऑर्डर करून, फ्रीजरमधून ब्रेड आणणे, लेबलींग करणे सँडविच सलाड बनवणे इ. इ. सर्व कामे मी शिकले आणि तरबेज झाले. कार्मेन आणि विकी रजेवर असताना सर्व काम मी एकटीने मला दिलेली मदतनीस हिच्या सहाय्याने केली तेव्हा मॅनेजर जेमी माझ्यावर खूप खुष झाली होती असे मला कार्मेन ने सांगितले तेव्हा मला खूप बरे वाटले. खूप कष्ट असलेली ही नोकरी मी पहिल्यांदाच करत आहे आणि मला कष्टाची सवय पण झाली आहे. दमायला खूप होते पण तब्येत ठणठणीत राहते. ८ तास उभे राहून काम करणे आणि फक्त जेवायला टेबल खुर्चीवर बसणे याची सवय झाली आहे. माझे पहिल्यांदा पाय अतोनात दुखायचे तेव्हा कार्मेनने मला सांगितले की तुला तुझे बूट बदलायला हवेत. मला कळेचना की बूट कशाला बदलायचे? ती म्हणाली की तू स्केचर्सचे बूट विकत घे. ते मी विकत घेतले आणि आता मला ८ तास उभे राहून काम करण्याची सवय झाली. नुसते उभे राहणे नाही तर काम करणे आणि ते सुद्धा वेगाने. पटापट हालचाली व्हायला हव्यात. स्टोअर मध्ये चालणेही खूप होते.
आम्हाला जे काही पदार्थ बनवायला लागतात त्याचे सामान आम्ही स्टोअरमधून हिंडूनच आणतो. काही सामान आमच्या बाजूलाच एक कोल्ड रूम आहे तिथे ठेवलेले असते. ज्या पारदर्शक डब्यात आम्ही बनवलेली सँडविचेस आणि सलाड ठेवतो ते डबेही आम्हाला दुसऱ्या एका खोलीतून आणायला लागतात. त्यामुळे चालणे बरेच होते. नुसते चालणे नाही तर हात वर केले जातात. डबे ठेवताना खाली वाकले जाते. फ्रीजर मधून ब्रेड , व्हनिला पुडींग चॉकलेटचे डबे आणताना जड जड उचलून हात आणि खांदे दुखतात आणि हातात ताकद येते. शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात त्यामुळे वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. जेव्हा आम्ही चिकन सलाड बनवतो ते बनवताना एक तर आधी चिकन धारदार सुरीने कापावे लागते. मग त्यात कांदे बारीक चिरून घालायचे आणि सेलेरी चिरून घालायची. हे बनवताना मेयोनिज लागते ते १ गॅलन घालावे लागते आणि हे सर्व हाताने कालवायचे. जसे चिखल कालवतोना तसेच. खूप जोर लागतो याला. मेयोनिज इतके काही थंड असते (फ्रीजरमध्ये असल्याने) की हाताला गार चटके बसतात.. हे मी बनवू शकते. बाकी सर्व प्रकारचे सलाड बनवायला मोठमोठाली घमेली लागतात.
डेली-उत्पादन विभागात आम्ही तिघी मिळून खूप प्रकार बनवतो. आम्हाला एका मिनिटाची पण फुरसत मिळत नाही. काम करता करता एकीकडे गप्पा मारतो. मी मांस, चिकन, मासे खात नसल्याने मला तिथले पदार्थ खाता येत नाहीत. पदार्थ बनल्यावर चव घेतात सर्वजणी अर्थात कस्टमरच्या नकळत खायला लागते लपून छपून. मी बिस्किटे आणि फळांच्या फोडी खाते. हे सर्व पदार्थ बनवून आम्ही विक्रीकरता मांडून ठेवतो. ते सर्व इतके आकर्षक दिसतात की माल पटापटा खपतो. काही कस्टमर आम्हाला येऊन सांगतात की तुम्ही खूप छान पदार्थ बनवता आणि बरीच व्हरायटी असते. आम्हाला तुमचे खूप कौतुक वाटते. तसेच स्टोअर मॅनेजरही आमचे कौतुक करतो. आम्ही तिघीही कामावर दांड्या अजिबात मारत नाही. बरे वाटत नसेल तरीही मी कामावर शक्यतोवर जातेच कारण की मी मग कामाचा भार जी कामावर आलेली असेल तिच्यावर पडतो. ही नोकरी लागल्यापासून माझे वजन १० किलो ने कमी झाले त्यामुळे मी खुश आहे.
कामावर गेल्यावर फ्लोअर चेक करून तिथे सँडविचेस आणि सलाड चे डबे ठेवून परत किती शिल्लक आहेत त्याप्रमाणे किती पदार्थ बनवायचे आहेत इथपासून ते मांस ऑर्डर करून, फ्रीजरमधून ब्रेड आणणे, लेबलींग करणे सँडविच सलाड बनवणे इ. इ. सर्व कामे मी शिकले आणि तरबेज झाले. कार्मेन आणि विकी रजेवर असताना सर्व काम मी एकटीने मला दिलेली मदतनीस हिच्या सहाय्याने केली तेव्हा मॅनेजर जेमी माझ्यावर खूप खुष झाली होती असे मला कार्मेन ने सांगितले तेव्हा मला खूप बरे वाटले. खूप कष्ट असलेली ही नोकरी मी पहिल्यांदाच करत आहे आणि मला कष्टाची सवय पण झाली आहे. दमायला खूप होते पण तब्येत ठणठणीत राहते. ८ तास उभे राहून काम करणे आणि फक्त जेवायला टेबल खुर्चीवर बसणे याची सवय झाली आहे. माझे पहिल्यांदा पाय अतोनात दुखायचे तेव्हा कार्मेनने मला सांगितले की तुला तुझे बूट बदलायला हवेत. मला कळेचना की बूट कशाला बदलायचे? ती म्हणाली की तू स्केचर्सचे बूट विकत घे. ते मी विकत घेतले आणि आता मला ८ तास उभे राहून काम करण्याची सवय झाली. नुसते उभे राहणे नाही तर काम करणे आणि ते सुद्धा वेगाने. पटापट हालचाली व्हायला हव्यात. स्टोअर मध्ये चालणेही खूप होते.
आम्हाला जे काही पदार्थ बनवायला लागतात त्याचे सामान आम्ही स्टोअरमधून हिंडूनच आणतो. काही सामान आमच्या बाजूलाच एक कोल्ड रूम आहे तिथे ठेवलेले असते. ज्या पारदर्शक डब्यात आम्ही बनवलेली सँडविचेस आणि सलाड ठेवतो ते डबेही आम्हाला दुसऱ्या एका खोलीतून आणायला लागतात. त्यामुळे चालणे बरेच होते. नुसते चालणे नाही तर हात वर केले जातात. डबे ठेवताना खाली वाकले जाते. फ्रीजर मधून ब्रेड , व्हनिला पुडींग चॉकलेटचे डबे आणताना जड जड उचलून हात आणि खांदे दुखतात आणि हातात ताकद येते. शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात त्यामुळे वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. जेव्हा आम्ही चिकन सलाड बनवतो ते बनवताना एक तर आधी चिकन धारदार सुरीने कापावे लागते. मग त्यात कांदे बारीक चिरून घालायचे आणि सेलेरी चिरून घालायची. हे बनवताना मेयोनिज लागते ते १ गॅलन घालावे लागते आणि हे सर्व हाताने कालवायचे. जसे चिखल कालवतोना तसेच. खूप जोर लागतो याला. मेयोनिज इतके काही थंड असते (फ्रीजरमध्ये असल्याने) की हाताला गार चटके बसतात.. हे मी बनवू शकते. बाकी सर्व प्रकारचे सलाड बनवायला मोठमोठाली घमेली लागतात.
डेली-उत्पादन विभागात आम्ही तिघी मिळून खूप प्रकार बनवतो. आम्हाला एका मिनिटाची पण फुरसत मिळत नाही. काम करता करता एकीकडे गप्पा मारतो. मी मांस, चिकन, मासे खात नसल्याने मला तिथले पदार्थ खाता येत नाहीत. पदार्थ बनल्यावर चव घेतात सर्वजणी अर्थात कस्टमरच्या नकळत खायला लागते लपून छपून. मी बिस्किटे आणि फळांच्या फोडी खाते. हे सर्व पदार्थ बनवून आम्ही विक्रीकरता मांडून ठेवतो. ते सर्व इतके आकर्षक दिसतात की माल पटापटा खपतो. काही कस्टमर आम्हाला येऊन सांगतात की तुम्ही खूप छान पदार्थ बनवता आणि बरीच व्हरायटी असते. आम्हाला तुमचे खूप कौतुक वाटते. तसेच स्टोअर मॅनेजरही आमचे कौतुक करतो. आम्ही तिघीही कामावर दांड्या अजिबात मारत नाही. बरे वाटत नसेल तरीही मी कामावर शक्यतोवर जातेच कारण की मी मग कामाचा भार जी कामावर आलेली असेल तिच्यावर पडतो. ही नोकरी लागल्यापासून माझे वजन १० किलो ने कमी झाले त्यामुळे मी खुश आहे.
Monday, October 02, 2017
इंगल्स मार्केट ... (५)
एके दिवशी मी फ्लोअर चेक करत होते त्यादिवशी विकी मला कॅफे मध्ये बसलेली
दिसली आणि ती रडत होती. मी मनात म्हणले नक्कीच काहीतरी झालेले आहे. ती
आल्यावर मी तिला विचारले काय झाले? तर ती म्हणाली की जेमी डेली मॅनेजरने
तिला झापले. मी म्हणाले का? तर म्हणाली जेमिचे असे म्हणणे की "मी (विकी)
हॉट बार आणि सब बार ला मदत करत नाही." मी म्हणाले करतेस की तू मदत. आपण
सगळ्याजणीच करतो.
डेली सेक्शनला असे आहे की हॉट बार आणि सब बार ला कुणी कस्टमर आले तर Customer Service First तिथे नेमलेल्या बायका असतात पण खूप गर्दी झाली तर आम्ही उत्पादन विभागातल्या, सुशी विभागातल्या बायका त्यांच्या मदतीला जातो. मी विकीला सांगितले रडू नकोस. ती बोलली ते मनावर घेऊ नकोस. बी हॅपी आणि मी तिला हग केले. तसे तिच्या चेहऱ्यावर थोडे हासू उमटले. नंतर २ दिवसांनी माझ्याबरोबर काम करणारी कार्मेन हिने मला सांगितले की विकी जेमिला म्हणाली की रोहिणी तिला मदत करत नाही. तेव्हा जेमी विकिला म्हणाली की रोहिणीला मध्ये आणू नकोस. तेव्हा मी कार्मेन ला सांगितले असे काहीच नाहीये. मी पण हॉट बारला मदत करते. नंतर जेमीने डेली मॅनेजरची जागा सोडली आणि Customer service या पोस्टवर गेली. ती म्हणाली की डेली सेक्शनला खूप कामाचे प्रेशर आहे.नंतर त्या जागी दुसरा डेली मॅनेजर आला. त्याने जेमिकडून ट्रेनिंग घ्यायला सुरवात केली आणि १५ दिवसानंतर कामाचे खूप प्रेशर आहे हे काम आपल्याला जमणार नाही म्हणून सोडून गेला. नंतर आला ऍडम. हा ऍडम मीट केसमध्ये काम करत होता आमच्याच स्टोअरला त्याने हे काम स्वीकारले. त्याने ३ महिने काम केले. काम चांगल्या रितीने सांभाळत होता. आणि नंतर तोही कामाचे प्रेशर खुप आहे. लोक माझे ऐकत नाहीत. मला मॅनेज करणे कठीण जात आहे म्हणून तोही सोडून गेला. आता मॅनेजरची पोस्ट Assistant Manager तेरेसाने घेतली आहे. ती रेसिस्ट आहे.
आम्ही जेव्हा कामावर येतो तेव्हा संगणकावर आल्याची नोंद करतो. शिवाय काम संपवून जातो तेव्हा आणि जेवणाच्या वेळेला जाताना आणि येताना अश्या प्रकारे सर्व प्रकारच्या नोंदी कराव्या लागतात. तिथेच एका चार्टवर कामावर असताना तुमचे वर्तन कश्या प्रकारे असू नये हे लिहिलेले आहे. शिवीगाळ करणे, अश्लील बोलणे-वागणे इ. इ. करू नये. जर का कुणी अश्या प्रकारे वर्तन केले आणि जर का कुणी कुणाची तक्रार केली की लगेचच त्याला/तिला कामावरून काढून टाकले जाते. आमच्या डेली विभागात दोन बायका आहेत त्या सगळ्यांना ऑर्डरी सोडत असतात जणू काही त्याच मॅनेजर आहेत ! हो, असे वाटते काहींना.
हॉट बार - सब बार ला एक आफ्रीकन अमेरिकनची नेमणूक झाली होती. तिच्यावर वर म्हणल्याप्रमाणे मॅनेजर समजून ऑर्डर सोडणारी एक बाई खेकसली. तिला ते सहन झाली नाही आणि तिने डेली मॅनेजर किंवा स्टोअर मॅनेजर कडे तक्रार न करता थेट एचआरडी कडे तक्रार केली. हे तिने उत्तम काम केले. एचआरडी कडून डेली मॅनेजर करवी त्या दोघींना चांगलाच "हग्या दम " मिळाला की "जर पुन्हा असे वर्तन केले तर तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल" दुसरी जी बाई आहे खेकसणारी तिने एका अमेरिकन बाईला ढकलले आणि हे प्रत्यक्ष डोळ्याने कार्मेन आणि रोझने पाहिले. ती बाई म्हणाली की मी नोकरी सोडते. तर कार्मेन म्हणाली तू कशाला नोकरी सोडतेस. तू तक्रार नोंदव. तुला न्याय मिळेल. अश्या रितीने दोन बायकांनी दोन बायकांविरूद्ध तक्रारी केल्या आणि त्यांना दम भरला की परत जर का असे केलेत तर तुहाला "टाटा बाय बाय" करावे लागेल.
डेली मॅनेजरचा त्या दोघी खेकसणाऱ्या बायका तिच्या मर्जीतल्या आहेत. एके दिवशी असे झाले की मीट केसमध्ये एक अमेरिकन बाई आहे ती आफ्रीकन अमेरिकन बाईला म्हणाली की मी तुला मीट कापून देते. तू तेव्हढे ते रॅप करून घे. माझ्याकडे आज खूप कस्टमर आहेत त्यामुळे मला वेळ नाहीये. तर ती आफ्रीकन अमेरिकन बाई वैतागली जिने तक्रार नोंदवली होती ती ही बाई. तिने मीट केसमधल्या त्या अमेरिकन बाईला तिच्या तोंडावर शिवी दिली. लगेच तिने डेली मॅनेजरला सांगितले आणि डेली मॅनेजरने तिला लगेचच कामावरून काढले.आता हिने तरी शिवीगाळ करावी का? बरे केली तरी शिव्या देण्यापेक्षा एखाद्याला ढकलणे हा जास्त मोठा गुन्हा आहे. डेली मॅनेजरने तिलाही दम भरला असता की एक वेळ सोडून देते. दुसऱ्या वेळी कामावरून काढण्यात येईल. तिला एक चान्स द्यायला हवा होता. बहुतेक डेली मॅनेजरला आफ्रीकन अमेरिकनने एच आरडी कडे तक्रार केल्याबद्दल राग आलेला असावा आणि सहनही झाले नसावे.
डेली सेक्शनला असे आहे की हॉट बार आणि सब बार ला कुणी कस्टमर आले तर Customer Service First तिथे नेमलेल्या बायका असतात पण खूप गर्दी झाली तर आम्ही उत्पादन विभागातल्या, सुशी विभागातल्या बायका त्यांच्या मदतीला जातो. मी विकीला सांगितले रडू नकोस. ती बोलली ते मनावर घेऊ नकोस. बी हॅपी आणि मी तिला हग केले. तसे तिच्या चेहऱ्यावर थोडे हासू उमटले. नंतर २ दिवसांनी माझ्याबरोबर काम करणारी कार्मेन हिने मला सांगितले की विकी जेमिला म्हणाली की रोहिणी तिला मदत करत नाही. तेव्हा जेमी विकिला म्हणाली की रोहिणीला मध्ये आणू नकोस. तेव्हा मी कार्मेन ला सांगितले असे काहीच नाहीये. मी पण हॉट बारला मदत करते. नंतर जेमीने डेली मॅनेजरची जागा सोडली आणि Customer service या पोस्टवर गेली. ती म्हणाली की डेली सेक्शनला खूप कामाचे प्रेशर आहे.नंतर त्या जागी दुसरा डेली मॅनेजर आला. त्याने जेमिकडून ट्रेनिंग घ्यायला सुरवात केली आणि १५ दिवसानंतर कामाचे खूप प्रेशर आहे हे काम आपल्याला जमणार नाही म्हणून सोडून गेला. नंतर आला ऍडम. हा ऍडम मीट केसमध्ये काम करत होता आमच्याच स्टोअरला त्याने हे काम स्वीकारले. त्याने ३ महिने काम केले. काम चांगल्या रितीने सांभाळत होता. आणि नंतर तोही कामाचे प्रेशर खुप आहे. लोक माझे ऐकत नाहीत. मला मॅनेज करणे कठीण जात आहे म्हणून तोही सोडून गेला. आता मॅनेजरची पोस्ट Assistant Manager तेरेसाने घेतली आहे. ती रेसिस्ट आहे.
आम्ही जेव्हा कामावर येतो तेव्हा संगणकावर आल्याची नोंद करतो. शिवाय काम संपवून जातो तेव्हा आणि जेवणाच्या वेळेला जाताना आणि येताना अश्या प्रकारे सर्व प्रकारच्या नोंदी कराव्या लागतात. तिथेच एका चार्टवर कामावर असताना तुमचे वर्तन कश्या प्रकारे असू नये हे लिहिलेले आहे. शिवीगाळ करणे, अश्लील बोलणे-वागणे इ. इ. करू नये. जर का कुणी अश्या प्रकारे वर्तन केले आणि जर का कुणी कुणाची तक्रार केली की लगेचच त्याला/तिला कामावरून काढून टाकले जाते. आमच्या डेली विभागात दोन बायका आहेत त्या सगळ्यांना ऑर्डरी सोडत असतात जणू काही त्याच मॅनेजर आहेत ! हो, असे वाटते काहींना.
हॉट बार - सब बार ला एक आफ्रीकन अमेरिकनची नेमणूक झाली होती. तिच्यावर वर म्हणल्याप्रमाणे मॅनेजर समजून ऑर्डर सोडणारी एक बाई खेकसली. तिला ते सहन झाली नाही आणि तिने डेली मॅनेजर किंवा स्टोअर मॅनेजर कडे तक्रार न करता थेट एचआरडी कडे तक्रार केली. हे तिने उत्तम काम केले. एचआरडी कडून डेली मॅनेजर करवी त्या दोघींना चांगलाच "हग्या दम " मिळाला की "जर पुन्हा असे वर्तन केले तर तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल" दुसरी जी बाई आहे खेकसणारी तिने एका अमेरिकन बाईला ढकलले आणि हे प्रत्यक्ष डोळ्याने कार्मेन आणि रोझने पाहिले. ती बाई म्हणाली की मी नोकरी सोडते. तर कार्मेन म्हणाली तू कशाला नोकरी सोडतेस. तू तक्रार नोंदव. तुला न्याय मिळेल. अश्या रितीने दोन बायकांनी दोन बायकांविरूद्ध तक्रारी केल्या आणि त्यांना दम भरला की परत जर का असे केलेत तर तुहाला "टाटा बाय बाय" करावे लागेल.
डेली मॅनेजरचा त्या दोघी खेकसणाऱ्या बायका तिच्या मर्जीतल्या आहेत. एके दिवशी असे झाले की मीट केसमध्ये एक अमेरिकन बाई आहे ती आफ्रीकन अमेरिकन बाईला म्हणाली की मी तुला मीट कापून देते. तू तेव्हढे ते रॅप करून घे. माझ्याकडे आज खूप कस्टमर आहेत त्यामुळे मला वेळ नाहीये. तर ती आफ्रीकन अमेरिकन बाई वैतागली जिने तक्रार नोंदवली होती ती ही बाई. तिने मीट केसमधल्या त्या अमेरिकन बाईला तिच्या तोंडावर शिवी दिली. लगेच तिने डेली मॅनेजरला सांगितले आणि डेली मॅनेजरने तिला लगेचच कामावरून काढले.आता हिने तरी शिवीगाळ करावी का? बरे केली तरी शिव्या देण्यापेक्षा एखाद्याला ढकलणे हा जास्त मोठा गुन्हा आहे. डेली मॅनेजरने तिलाही दम भरला असता की एक वेळ सोडून देते. दुसऱ्या वेळी कामावरून काढण्यात येईल. तिला एक चान्स द्यायला हवा होता. बहुतेक डेली मॅनेजरला आफ्रीकन अमेरिकनने एच आरडी कडे तक्रार केल्याबद्दल राग आलेला असावा आणि सहनही झाले नसावे.
Thursday, September 14, 2017
अनामिका ... (१०)
चार दिवस उलटून गेले तरी अजून अमितचा फोन का आला नाही या विचारातच संजली असते. ती विचार करते की इतका लांबचा प्रवास आहे तिकडे पोहोचल्यावर झोपेचं झालेलं खोबरे, दगदग, नंतर आप्गीसला जॉईन होणे यामध्येच त्याचा वेळ जात असणार हे नक्किच ! आपण
अजून
अजून
आठ दिवस तरी त्याच्या फोनची वा ट पहायला नको. आपणही आता कामाला लागायला हवे. घरातले पसारे पा हून तिचे तिलाच खूप हासू येते.आणि स्वतःच्याच मनाशी म्हणते आपण नव्हतो तर या बापलेकाने मिळून किती पसारे घालून्न ठेवलेत ! एक गोष्ट जागेवर नाही. संजली हळूहळूपसारा आवरायला घेते खरी पण मन मात्र घडलेल्या प्रसंगातच बुडून गेलेले असते. काय हा योगायोग !
ती स्वतःच्या मनाशीच हसते. तिच्यामुलाच्या ओरडण्यानेच ती भानावर येते. अगं आई मी तुला किती वेळा सांगितले की मला भूक लागली आहे म्हणून पण तुझे क्षच नाहिये.होरे. ओरडू नकोस. स्वयंपाक तयार आहे , जा जेवून घे. "आई वाढ ना ग मला जेवायला" अरे घे ना वाढून तुझे
तू. मला बरीच कामे आहेत.
आई अशी काय वागते आहे आज, कामे ती स्वतःच्या मनाशीच हसते. तिच्यामुलाच्या ओरडण्यानेच ती भानावर येते. अगं आई मी तुला किती वेळा सांगितले की मला भूक लागली आहे म्हणून पण तुझे क्षच नाहिये.होरे. ओरडू नकोस. स्वयंपाक तयार आहे , जा जेवून घे. "आई वाढ ना ग मला जेवायला" अरे घे ना वाढून तुझे
तू. मला बरीच कामे आहेत.
८,१०,१५ ! इतके दिवस उलटूनही अमितचा फोन आलेला नसतो. आता मात्र संजली खूप रडकुंडीला येते. विसरला का अमित आपल्याला? काय गं संजली तू रडतेस? अनिल विचारतो. कुठे काय? मी नाही रडत. आल्यापासून सतत कामाला जुंपली आहे. मी नव्हते तर घराची काय अवस्था होती, किती पसारा घातला होता? काम करता करता संजली कॉटवर बसते आणि तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागतात. अनिल तिच्या जवळ येऊन बसतो आणि विचारतो काय झाले तुला संजली? मुंबईवरून आल्यावर किती खुशीत होतीस आणि
दुपारची जेवणे आटोपल्यावर संजली वाड्यातल्या
झोपाळ्यावर आडवी होते. जेवणानंतर झोपळ्यावर थोडे आडवे होणे ही तिची
नेहमीची सवय असते. संजली आडवी होते आणि तिला थोडी डुलकी लागते. उठते तेव्हा
तिचा फोन वाजत असतो. ती घाईघाईने फोन उचलते आणि हॅलो म्हणते तर पलीकडून
आवाज येतो हॅलो संजली मी अमित बोलतोय. ओह ! अमित तु बोलतो आहेस. खूप मोठ्या
झोपाळ्यावर आडवी पडलेली संजली उठून बसते. किती दिवसांनी फोन? कसा आहेस?
वेळेवर पोहोचलास का? आता किती वाजले तिकडे? एक ना हजार प्रश्न. अमित म्हणतो
अंग इथे आता पहाटेचे ४ वाजलेत. काय? ती जवळजव्ळ ओरडतेच. अंग हो मला फोन
करायला आताच थोडा वेळ मिळतोय. बरं मी तुला असाच आता या वेळेला फोन करत जाऊ
का? तुला कोणती वेळ
सोयीची आहे? संजली म्हणते ही वेळ खरी तर मला खूपच सोयीची आहे. पण तुला
इतक्या पहाटे उठायला लागेल? तुला खूप त्रास होईल त्याचा. अगं संजली त्रास
नाही होणार मला. कामा निमित्ताने मला काहीवेळा रात्रभर जागायला लागते. मी
आता ऑफीस मधूनच बोलतोय. तुझा ईमेल आयडी आहे का? तिकडे बोलत जाऊ. मला तुला
फोन करायला तसे अवघडच आहे. पण जमेल तसा तुला फोन करत जाईन. पण तुझा ईमेल
आयडी असेल तर तिथे बोलू शिवाय फोन वरून बोलायची वेळही ठरवता येईल.
संजली सांगते नाही रे. माझा का ही ईमेल आयडी वगरे नाही. मला कं प्युटर
मधले ओ की ठो कळत नाही. मला फोनची खूप सवय आहे. त्यावरून माझी सगळी कामे
होतात आणि बोलणे पण होते. पण मी मैत्रिणींना विचारून तुला मेल पाठवीन.
अर्थात तुझा काय आहे ईमेल. पण आता त्या भानगडी नकोत. सध्या तरी आपण
फोनवरूनच बोलू. पण ही वेळ मला खूप सोयीची आहे.
बरे अमित, तू सांगितलेस म्हणून मी अनिलला अजून काहीही सांगितले नाहीये की आपण भेटलो म्हणून. अमित म्हणतो होहो नकोस सांगूस इतक्यात. मला पुढच्या भारतभेटीत त्याला सरप् राईज द्यायचे आहे. अमित म्हणतो. आता काय करतेस? कशी आहेस. तुझाही मुंबई पुणे प् रवास कसा झाला. संजली म्हणते मि मजेत आहे. अरे प्रवासात मला आपल्या टीबद्दलच सारखे आठवत होते. लग्नात आम्ही मैत्रीणींनी खूप मजा केली. मला पण चेंज मिळाला. आता घरी आले आणि परत कामाला जुंपलेली आहे. खरे तर मा झे कशात लक्षच लागत नाहीये. तु झ्याशी खूप बोलावेसे वाटत आहे. अमित म्हणतो तुला आठवत आहे का
काही अजून पूर्वीचे. तसे संजली म्हणते की हो काही आठवत आहे. काही
नाही. अमित संजलीला विचारतो की माझे कॉलेज संपल्यावर मी तुमच्याकडे पेढे
घेऊन आलो होतो ते आठवत आहे का तुला? संजली खुदकन हासते आणि म्हणते हो.
चांगलेच आठवत आहे. तु माझी सकाळी सकाळी येऊन झोपमोड केली
होतीस. अमित म्हणतो चल आता मी फोन ठेवतो.
संजली अमितचा फोन नंबर "अनामिका" या नावाने सेव्ह करते. आणि परत झोपाळ्यावर आडवी होते. मागचे दिवस तिला आठवतात आणि त्या दिवसातच ती रमून जाते. संध्याकाळी आवरून भाजी आणते. स्वयंपाक करते. अनिल आल्यावर ती खरे तर दोघेच बाहेर जाणार असतात. अनिल ऑफीस मधून आल्यावर संजलीला बाहेर जाण्याबद्दल विचारतो तर ती म्हणते जाऊ देत. घरीच जेवु. परत कधीतरी जाऊ बाहेर जेवायला.
संजली अमितचा फोन नंबर "अनामिका" या नावाने सेव्ह करते. आणि परत झोपाळ्यावर आडवी होते. मागचे दिवस तिला आठवतात आणि त्या दिवसातच ती रमून जाते. संध्याकाळी आवरून भाजी आणते. स्वयंपाक करते. अनिल आल्यावर ती खरे तर दोघेच बाहेर जाणार असतात. अनिल ऑफीस मधून आल्यावर संजलीला बाहेर जाण्याबद्दल विचारतो तर ती म्हणते जाऊ देत. घरीच जेवु. परत कधीतरी जाऊ बाहेर जेवायला.
Tuesday, September 05, 2017
हवेशीर घर
अपार्टमेंट सी सेव्हन मला पाहताच क्षणी आवडून गेले. एकमात्र तोटा होता की, या घरामध्ये पाऊल ठेवताक्षणीच स्वयंपाकघर होते. या स्वयंपाकघराला एक छोटी खिडकी होती. स्वयंपाक करता करता सहजच खिडकीतून डोकावले जायचे. एखाद्दुसरी बाई स्ट्रोलरमध्ये बाळाला बसवून चालत जाताना दिसायची. स्वयंपाकघराला लागूनच मोठाच्या मोठा हॉल होता. हॉलला आणि स्वयंपाकघराला लागूनच डाव्या बाजूला दोन मोठ्या बेडरूम होत्या. हॉलच्या एका बाजूला काचेची सरकती दारे होती. ही काचेची दारे आणि प्रवेशाचे दार उघडे ठेवले की, हवा खूप खेळती राहायची आणि म्हणूनच आम्ही एक आरामदायी खुर्ची या जागेच्या आणि पर्यायाने खेळत्या हवेच्या मधोमध ठेवली होती. या खुर्चीवर खास हवा खाण्याकरिता म्हणून बसणे व्हायचे.
घराच्या दोन्ही बाजूला मोठाल्या बाल्कन्या होत्या. घराच्या प्रत्येक खोलीत सीलिंग फॅन होते. सीलिंग फॅन आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचे होते. ऐन थंडीत हिटर लावलेला असतानाही डोक्यावर फिरणारा पंखा आम्हाला हवाच असतो आणि म्हणूनच मला हे घर जास्त आवडले होते. घराच्या दोन्ही बाजूला बाल्कन्या आणि खेळती हवा ही तर अजूनच मोठी जमेची बाजू होती. स्वयंपाक करता करता हॉलमध्ये ठेवलेला टीव्ही बघता यायचा. बाल्कनीला लागूनच एक जिना होता. या जिन्यात मी दुपारचा चहा पीत बसायचे. स्वयंपाकघराला लागून जी बेडरूम होती ती पुढे पुढे माझीच होऊन गेली होती. तिथे बसून मी जे काही सुचेल ते लिहायचे. कधीकधी मध्यरात्री उठून या दुसर्या बेडरूममध्ये यायचे. लॅपटॉपवर मैत्रिणींशी बोलायचे आणि मग तिथेच झोपून जायचे. या बेडरूमच्या बाहेर अनेक हिरवीगार झाडे होती. पहाटेच्या सुमारास या झाडांवरच्या पक्ष्यांंची किलबिल सुरू व्हायची. खिडकीतून बाहेर पाहिले, तर काही वेळेला आकाशात रंग जमा झालेले असायचे. मग लगेच मी कॅमेरा घेऊन बाल्कनीत उभे राहून सूर्योदय होण्याची वाट पाहत बसायचे.
बाल्कनीत उभे राहिले की, उजव्या बाजूला सूर्योदय दिसायचा, तर डाव्या बाजूला सूर्यास्त. उन्हाळ्यातली वाळवणं मी याच बाल्कनीत वाळवायला ठेवत असे. दुपारच्या वेळी हॉलमधल्या सोफ्यावर बसलेली असताना काही वेळा अंधारून यायचे आणि मुसळधार पावसाला सुरुवात व्हायची. सरकत्या काचेच्या दारातून मुसळधार पावसाला बघत राहायचे मी. या दोन्ही बाल्कन्यांच्या कठड्यावर अनेक पक्षी येऊन बसत. या घरातला हॉल इतका मोठा होता की, रात्रीच्या जेवणानंतर बाहेर जायचा कंटाळा आला की, हॉलमध्येच शतपावली घातली जायची.
या घरातल्या स्वयंपाकघरात सणासुदीच्या दिवशी साग्रसंगीत पदार्थ केले जायचे आणि नैवेद्याचे ताट वाढून मी फोटोकरिता हॉलमध्ये यायचे. हॉलमध्ये असलेल्या आरामदायी खुर्चीवर ताट ठेवून फोटो काढायचे. पदार्थांचे फोटो काढण्याकरिता हा स्पॉट जणू ठरूनच गेला होता. या घरातल्या मास्टर बेडरूमच्या खिडकीतून पौर्णिमेचा चंद्र दिसायचा. चंद्राला बघून आपोआप गाणे गुणगुणले जायचे- ‘ये रात भीगी भीगी, ये मस्त नजारे, उठा धीरे धीरे वो चॉंद प्यारा प्यारा…’
असे हे माझे सुंदर-साजिरे घर माझ्या आठवणींचा ठेवा बनून राहिले आहे…
रोहिणी गोरे
वॉशिंग्टन, युएस
अनंत चतुर्दशी
अनंत
चतुर्दशी म्हणली की माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचे दिवस येतात. किती छान
मिरवणूक निघायची. पहाटे उजाडायच्या आत मिरवणूक संपत आलेली असायची. आम्ही
दोघी बहिणी आणि आई नवीपेठेत राहणाऱ्या
मामाकडे यायचो आणि दुपारी १२ ते १
च्या सुमारास आम्हाला पहिल्या ५ मानाच्या गणपतीचे दर्शन व्हायचे ते अल्का
टॉकीजजवळ. गुलाल उधळलेले रस्ते छान दिसायचे. ढोल ताशांचे रिदम हृदयाला
भिडायचे. संध्याकाळी ७ नंतर आम्ही तिघी आणि मामी अल्का टॉकीजच्या जवळच्या
फूटपाथवर संतरंज्या घालून बसायचो. नंतर साधारण रात्री ९ च्या सुमारास
नारायणपेठेत राहणाऱ्या मामाकडे सगळी जनता जमायची.
आमची एक मामे बहीण तिच्या घरातील गणपतीचे विसर्जन करून यायची. सदाशिव पेठेतले मामेभाऊ आणि बहिणी यायच्या. नवी पेठेत राहणारे मामेभाऊ यायचे. मग नारायण पेठेत आमच्या सर्व भावंडांचा आणि त्यांच्या मित्र मैत्रिणींचा एक अड्डा जमायचा. त्या घरी राहणाऱ्या मामाकडे रात्रीचे जेवण व्हायचे. नंतर माझी आई आणि माम्या झोपायच्या आणि आम्हाला बजाऊन सांगायच्या की दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती आला की लगेच आम्हाला सांगायला या. नंतर आम्ही मामेबहिणी घोळक्याने एकमेकींच्या हातात हात घालून अल्का टॉकीज ते मंडई पर्यंत चालायचो. मध्येच एका गल्लीत जाऊन भेळ खायचो. मध्यरात्री सुजाता हॉटेल मध्ये जाऊन बटाटावडा खायचो. पिपाण्या वाजवायचो. थोड्याश्या तारवटलेल्या डोळ्यांनीच परत नारायण पेठेतल्या मामाच्या घरी यायचो. आमचे सर्व मामे भाऊ मिरवणूकी सामील झालेले असायचे.ढोल ताशे पण वाजवायचे. पहाटे ३ ते ४ च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती मिरवणूकीत विसर्जनासाठी सामील व्हायचे त्या आधी ११ च्या सुमारास लाईटिंगचे गणपती जायला सुरू व्हायचे. काळ्या कुट्ट अंधारात लाईटिंगचे गणपती खूपच देखणे दिसायचे. मोठमोठाल्या मूर्ती ट्रक मध्ये असायच्या. आजुबाजूला मुल., तरूण मंडळी असायची. तर काही जण गणपतीच्या बाजूलाच गणपतीच्या भव्य मूर्तीची काळजी घ्यायला असायचे. एकेक करत ओळीने गणपती मंडईपासून निघालेले असायचे विसर्जनासाठी जायला.
दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती पाहण्यासाठी लोक आतुर झालेले असायचे. त्यांच्यापुढे ढोल ताशे तर असायचेच पण लेझीम खेळणारी मुले पण असायची. खूप फटाके वाजायचे. हे २ गणपती पाहण्यासाठी अलोट गर्दी. गर्दीला आवरणासाठी कडक व्यवस्था होती. सर्वजण साखळी पद्धतीने हातात हात घालून गर्दीला आवरायचे. या दोन्ही गणपतींना पाहत बसावे, ही मिरवणूक पुढे सरकूच नये असे वाटायचे. त्यावेळेला प्रत्येक चौकात खूप स्वागत व्हायचे. खूप शिस्त होती त्यावेळेला. ढोल ताशांचे रिदमही अजिबात संपू नये असे वाटायचे.
आम्ही सर्व जण पहाटे हे दोन्ही गणपती पहायला लक्ष्मीरोड वर हजर व्हायचो. गणपतीला डोळे भरून पहायचो. नमस्कार करायचो. हा सर्व सोहळा डोळ्यात साठलेला असायचा मिरवणूकीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत ! मिरवणूक संपली की थोडे उजाडायला लागायचे. सर्वजण अमृततुल्यचा चहा घ्यायचो. अमृततुल्यच्या टपरीवर आम्ही १५-२० जण! चांगले दोन तीन कप आले घातलेला व चहाचा मसाला घातलेला चहा प्यायचो. चहा पिऊन तारवटलेल्या डोळ्यांना जरा तरतरी यायची. मिरवणूक संपल्यावर कोणीही परस्पर घरी जायचे नाही, कारण मामीने सगळ्यांना बजावून सांगितलेले असायचे की घरी या, अंघोळी करा, पिठलं भात खा, मग घरी जाऊन झोपा हवे तितके.
चहा झाला की परत रमतगमत, हसत, गप्पा मारत मामाच्या घरी परतायचो. त्या दिवशी जेवायला पिठलं भात ठरलेला असायचा. त्याबरोबर कोणतीतरी चटणी लसणाची किंवा ओल्या नारळाची! एकदा आम्ही सर्व पोरांनी सुचवले की हे काय? त्याच त्याच चटण्या काय? जरा कोणतीतरी वेगळी चटणी करा की! कोणती चटणी करणार? ह्याच दोन चटण्या छान लागतात पिठलं भाताबरोबर. पण त्यादिवशी आम्ही आमचा हेका सोडलाच नाही. शेवटी आईने पर्याय काढला. आई म्हणाली आपण कुड्या करायच्या का? माझी मामी म्हणाली काय गो, हा कोणता प्रकार? कधी ऐकला नाही तो! मग आईने सांगितले की तिची आई तिच्या लहानपणी हा प्रकार करायची. मग ठरले. सर्वजण लसूण सोलायला बसले. दोघीजणी नारळ खवायला बसल्या. लसूण खोबरे व हिरव्यागार मिरच्या फोडणीमध्ये परतल्या गेल्या. कढई भरून केल्या. जेवताना पिठलं भातापेक्षा कुड्याच जास्त संपल्या!
त्या दिवसापासून प्रत्येक अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे खरं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण मिरवणूक दुसऱ्या दिवशी संपते!, हा मेनू कायमचा ठरून गेला.
आमच्या घरचा गणपती 2017
आमची एक मामे बहीण तिच्या घरातील गणपतीचे विसर्जन करून यायची. सदाशिव पेठेतले मामेभाऊ आणि बहिणी यायच्या. नवी पेठेत राहणारे मामेभाऊ यायचे. मग नारायण पेठेत आमच्या सर्व भावंडांचा आणि त्यांच्या मित्र मैत्रिणींचा एक अड्डा जमायचा. त्या घरी राहणाऱ्या मामाकडे रात्रीचे जेवण व्हायचे. नंतर माझी आई आणि माम्या झोपायच्या आणि आम्हाला बजाऊन सांगायच्या की दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती आला की लगेच आम्हाला सांगायला या. नंतर आम्ही मामेबहिणी घोळक्याने एकमेकींच्या हातात हात घालून अल्का टॉकीज ते मंडई पर्यंत चालायचो. मध्येच एका गल्लीत जाऊन भेळ खायचो. मध्यरात्री सुजाता हॉटेल मध्ये जाऊन बटाटावडा खायचो. पिपाण्या वाजवायचो. थोड्याश्या तारवटलेल्या डोळ्यांनीच परत नारायण पेठेतल्या मामाच्या घरी यायचो. आमचे सर्व मामे भाऊ मिरवणूकी सामील झालेले असायचे.ढोल ताशे पण वाजवायचे. पहाटे ३ ते ४ च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती मिरवणूकीत विसर्जनासाठी सामील व्हायचे त्या आधी ११ च्या सुमारास लाईटिंगचे गणपती जायला सुरू व्हायचे. काळ्या कुट्ट अंधारात लाईटिंगचे गणपती खूपच देखणे दिसायचे. मोठमोठाल्या मूर्ती ट्रक मध्ये असायच्या. आजुबाजूला मुल., तरूण मंडळी असायची. तर काही जण गणपतीच्या बाजूलाच गणपतीच्या भव्य मूर्तीची काळजी घ्यायला असायचे. एकेक करत ओळीने गणपती मंडईपासून निघालेले असायचे विसर्जनासाठी जायला.
दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती पाहण्यासाठी लोक आतुर झालेले असायचे. त्यांच्यापुढे ढोल ताशे तर असायचेच पण लेझीम खेळणारी मुले पण असायची. खूप फटाके वाजायचे. हे २ गणपती पाहण्यासाठी अलोट गर्दी. गर्दीला आवरणासाठी कडक व्यवस्था होती. सर्वजण साखळी पद्धतीने हातात हात घालून गर्दीला आवरायचे. या दोन्ही गणपतींना पाहत बसावे, ही मिरवणूक पुढे सरकूच नये असे वाटायचे. त्यावेळेला प्रत्येक चौकात खूप स्वागत व्हायचे. खूप शिस्त होती त्यावेळेला. ढोल ताशांचे रिदमही अजिबात संपू नये असे वाटायचे.
आम्ही सर्व जण पहाटे हे दोन्ही गणपती पहायला लक्ष्मीरोड वर हजर व्हायचो. गणपतीला डोळे भरून पहायचो. नमस्कार करायचो. हा सर्व सोहळा डोळ्यात साठलेला असायचा मिरवणूकीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत ! मिरवणूक संपली की थोडे उजाडायला लागायचे. सर्वजण अमृततुल्यचा चहा घ्यायचो. अमृततुल्यच्या टपरीवर आम्ही १५-२० जण! चांगले दोन तीन कप आले घातलेला व चहाचा मसाला घातलेला चहा प्यायचो. चहा पिऊन तारवटलेल्या डोळ्यांना जरा तरतरी यायची. मिरवणूक संपल्यावर कोणीही परस्पर घरी जायचे नाही, कारण मामीने सगळ्यांना बजावून सांगितलेले असायचे की घरी या, अंघोळी करा, पिठलं भात खा, मग घरी जाऊन झोपा हवे तितके.
चहा झाला की परत रमतगमत, हसत, गप्पा मारत मामाच्या घरी परतायचो. त्या दिवशी जेवायला पिठलं भात ठरलेला असायचा. त्याबरोबर कोणतीतरी चटणी लसणाची किंवा ओल्या नारळाची! एकदा आम्ही सर्व पोरांनी सुचवले की हे काय? त्याच त्याच चटण्या काय? जरा कोणतीतरी वेगळी चटणी करा की! कोणती चटणी करणार? ह्याच दोन चटण्या छान लागतात पिठलं भाताबरोबर. पण त्यादिवशी आम्ही आमचा हेका सोडलाच नाही. शेवटी आईने पर्याय काढला. आई म्हणाली आपण कुड्या करायच्या का? माझी मामी म्हणाली काय गो, हा कोणता प्रकार? कधी ऐकला नाही तो! मग आईने सांगितले की तिची आई तिच्या लहानपणी हा प्रकार करायची. मग ठरले. सर्वजण लसूण सोलायला बसले. दोघीजणी नारळ खवायला बसल्या. लसूण खोबरे व हिरव्यागार मिरच्या फोडणीमध्ये परतल्या गेल्या. कढई भरून केल्या. जेवताना पिठलं भातापेक्षा कुड्याच जास्त संपल्या!
त्या दिवसापासून प्रत्येक अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे खरं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण मिरवणूक दुसऱ्या दिवशी संपते!, हा मेनू कायमचा ठरून गेला.
आमच्या घरचा गणपती 2017
Monday, August 21, 2017
खग्रास सूर्यग्रहण - एक अविस्मरणीय अनुभव !!
सूर्यग्रहण पहायला मिळेल असे काही आमच्या ध्यानीमनी नव्हते. अमेरिकेतल्या काही राज्यांमधून ते दिसणार होते. मागच्याच आठवड्यात कळाले की Brevard शहरात खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. Brevard शहर आम्ही राहत असलेल्या Hendersonville शहरापासून साधारण अर्ध्या तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे जिथे विनायक ऑफीसला जातो. सूर्यग्रहण बघण्याच्या काचा आम्हाला विनायकच्या ऑफीसमधून मिळाणार होत्या. २१ ऑगस्ट २०१७ हा दिवस आमच्या दोघांच्या आयुष्यातील खूप आकर्षक दिवस ठरून गेला. सोमवारची मी रजा टाकली होती आणि विनायक बरोबर सकाळी सर्व तयारीनिशी मीही निघाले. विनायकचे ऑफीस आणि इंगल्स स्टोअर्स हे समोरासमोर आहेत. अगदी समोरासमोर नाही पण ऑफीस मधून २ ते ३ मिनिटे ड्राईव्ह केल्यावर एक मोठा चौक लागतो. हा चौक ओल्यांडल्यावर सरळ गेले की इंगल्स स्टोअर्स लागते जिथे मी काम करते पण मी काम करते ते आम्ही राहत असलेल्या शहरात. आमच्या घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर. या इंगल्स स्टोअर्सची २०० ग्रोसरी आणि इतर अशी दुकाने आहेत २ ते ३ राज्यांमध्ये मिळून. या स्टोअर्समध्ये स्टरबक्स कॉफी आहे. शिवाय इथला कॅफे इतका काही छान आहे की इथे येऊन कोणीही कितीही वेळ बसावे. काहीही करावे. वाचावे, लेखन करावे, लॅपटॉपवर काम करावे.
खग्रास सूर्यग्रहण बघण्याच्या टप्यात विनायकचे ऑफीस आणि इंगल्स स्टोअर्स असल्यानेच या योग जुळून आला होता. आम्ही सकाळी निघालो ते विनायकने मला आधी इंगल्स मध्ये सोडले आणि तो ऑफीसला गेला. सुमारे १ वाजता मला विनायकने ग्रहण बघण्याच्या काचा आणून दिल्या. त्या आधी मी ९ ते १ कॅफेत बसून होते. ९ ते ११ वहीत बरेच काही लिहिले. ब्लॉगवरचे काही लेख अपूर्ण आहेत ते मला संपवायचे आहेत. लिखाणासाठी जो निवांत वेळ लागतो तो आज मला सूर्यग्रहणाच्या निमित्ताने मिळाला होता. ११ वाजता मी व्हेज सँडविच खाल्ले. combo sub मध्ये सँडविच बरोबर कोक आणि बटाटा चिप्सही मिळतात. जेवण झाल्यावर मी सूर्यग्रहण पहाण्यासाठी इंगल्सच्या पार्कींग लॉट मध्ये एका झाडाखाली येऊन बसले. बरेच जण झाडाखाली अंथरूणे पसरून पहुडली होती. काही जण खुर्च्या आणून त्यावर बसले होते. तर काही जण कार मध्येच कूलींग लावून बसले होते. चित्रपटाची सुरवात झाली. किती छान दिसतोय सूर्य ! मनाशीच बोलले मी ! विस्तीर्ण लांबवर पसरलेले आकाश आणि काचेतून सूर्याचा गोळा एखाद्या श्रिखंडाच्या गोळी सारखा पिवळा दिसत होता. आजुबाजूला काळे निळे, तर काही धुरकट पांढरे ढगही दिसत होते. चंद्राची सूर्यावर सावली पडायला सुरवात झाली. ही चंद्राची काळी चकती हळूहळू पुढे सरकत होती. अधून मधून मी विनायकशी फोनवर बोलत होते. विनायकच्या ऑफिसमधले सर्वजण काम करता करता अधून मधून बाहेर येत होते आणि ग्रहणाला बघत होते. वेदर पार्टली क्लाऊडी
असल्याने काळे निळे ढग ग्रहणावरती येऊन परत बाजूला होत होते, असे दृश्यही बघायला मिळाले. सूर्य तर खूपच देखणा दिसत होता. मी अधून मधून सूर्यग्रहण बघत होते तर अधून मधून झाडाखाली सावलीत बसत होते. असा खेळ दीड तास चालला. २ वाजून ३० मिनिटांनी एक मोठा Climax ्स झाला. Climax तर मध्यंतराच्या आधीच संपला. आता स्टोरीत काही अर्ध उरला नाही म्हणून लोक परतायला लागले. चंद्राने सूर्याला स्पर्श केला तेव्हा दुपारचा १ वाजून ८ मिनिटे झाली होती. चंद्राने मुहूर्त अजिबात चुकवला नाही. स्पर्श करून जेव्हा तो पुढे सरकला तेव्हा तर सफरचंद दाताने तोडून थोडा भाग खाल्यासारखे कसे दिसते तसेच चित्र दिसले. Just like apple product symbol !
Photo credit - Los Angles Times - from Net
Climax जेव्हा जवळ यायची वेळ आली तेव्हा तर सर्वजण श्वास रोखून सूर्याला आणि त्यावरच्या चंद्राच्या चकतीला पाहत होते. थोडे थोडे करत सूर्य झाकला जात होता. आता अगदी काही क्षणच उरले होते. सरते शेवटी बांगडी फुटलेल्या बारीक काचेचा तुकडा कसा दिसतो तसाच सूर्याचा तुकडा दिसला. आणि नंतर हळूहळू एक टिंब आणि नंतर काही सेंकदातच सूर्य पूर्णपणे झाकला गेला. तेव्हा तर "ये पल तो यही थम जाए तो अच्छा होगा " अशीच माझ्या मनाची अवस्था होऊन गेली. संध्याकाळ नाही तर पूर्णपणे अंधार ! रात्रच जणू ! आकाशात कुणीतरी टॉर्च घेऊन उभे आहे असेच वाटत होते. आता सूर्याकडे काचेशिवाय बघता येत होते. जेव्हा चंद्र उजवीकडून डावीकडे सरकला मात्र !अहाहा ! सर्वांना हिऱ्याच्या अंगठीचे दर्शन झाले. सूर्याची वळ्यासारखी दिसणारी कड आणि मधोमध सूर्याचा तेजस्वी तेजाचा हिऱ्यासारखा चमकणारा खडा ! काय ही निसर्गाची किमया ! देवा तुझी करणी अगाध आहे रे ! खूप गहिवरून आले मला. अश्रू गालावरून ओघळले. आता सूर्याची कोर उजव्या बाजूने दिसायला लागली आणि नंतर वाढत गेली. अडीचला मी परत कॅफेत येऊन बसले आणि हा अवर्णनीय अनुभव वहीत उतरवला. पावणेचारच्या सुमारास मी परत पार्कींग लॉटमध्ये गेले आणि झाडाखाली उभे राऊन सूर्याला परत डोळे भरून पाहून घेतले. आता चंद्राची सावली कमी कमी होत गेली आणि परत सूर्याचा तप्त पिवळा गोळा दिसायला लागला. चारच्या सुमारास कॉफी प्यायली आणि विनायकची वाट पाहत परत कॅफेत येऊन बसले. निसर्गाचे चित्र बदलून रपारप पाऊस पडायला सुरवात झाली. घरी परत येताना वाहतूक मुरंबा ! घरी आलो आणि लगेचच मी हा लेख टंकत आहे. आज मी खूप भारावून गेली आहे !! आता हे भारावलेपण २ दिवस तरी नक्कीच टिकेल. आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये सूर्यग्रहणाचा अवर्णनीय सोहळा पहाण्याचा जबरदस्त योग जुळून आला होता तर !!!
Rohini Gore - smruti blog Photo credit - Los Angles Times from Net
Photo Credit - Only in North Carolina Page - Photo taken by Sallie J. Woodring Photography
Downlod from Internet
Tuesday, July 11, 2017
Subscribe to:
Posts (Atom)