Saturday, July 07, 2018

आपला मराठी बिग बॉस

आपला मराठी बिग बॉस बद्दल थोडेसे ....


सई, पुष्कर, मेघा यांचे त्रिकुट मोडले. मेघाने आयत्या वेळेस आस्तादला कॅप्टन पदाबद्दल तिचे मत दिले आणि ती म्हणाली की मला आता कॅप्टन पद नको आहे. बिग बॉसने सांगितले असताना की तुम्ही वेळ घ्या, चर्चा करा आणि मग तुमचा उमेदवार ठरवा. तरी तिने अचानक बाँब गोळा टाकला. हे तिचे वर्तन बघून सई आणि पुष्कर खूपच चिडले. सईचे म्हणणे इतकेच होते की मेघाने आधी त्याबद्दल त्या दोघांशी बोलायला हवे होते. नंतर मेघाने माफी मागितली आणि मी त्याबद्दल आधी तसा विचारच केला नव्हता. मला त्यावेळेला एकदम डोक्यात आले ते मी बोलून दाखवले हे स्पष्टीकरण अजिबातच पटणारे नव्हते. ज्या बाईच्या डोक्यात फक्त टास्क करण्याबाबतच विचार घोळत असतात ती असे एकदम करणे शक्यच नाही. दुसऱ्या टीम बद्दल सहानुभूती दाखवून त्यांच्या टीम मधून मते तिला मिळवायची होती.



आस्ताद साठी कॅप्टन पदासाठी मेघाने तिचे मत दिले. त्यावर आस्ताद आणि रेशला आनंदही झाला. पण त्यावर पुष्करने माती खाल्ली. मेघा आस्तादच्या एका गेम मध्ये त्याच्याविरुद्ध खेळत होती हे त्याने सर्वांसमोर जाहीर केले. त्यामुळे मेघा खूपच दुखावली. त्यामुळे झाले काय की आस्ताद आणि रेशम यांना कोलीतच मिळाले. आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा नंतरच्या बऱ्याच टास्क नंतर परत कॅप्टन पदासाठी निवडीची वेळ आली तेव्हा मेघा म्हणाली मला पुष्करने सासू - जावई या गेम मध्ये खूप छळले आहे आणि त्यामुळे मी या पदासाठी योग्य आहे हे सांगितले. आणि एकूणच चर्चा सत्र आधीच्या विजयी टीमचे चालू होते. त्यांचा निर्णय होत नव्हता. आवाज खूप वाढत होते. नंतर सगळेच एकत्र झाले आणि मेघावर सगळ्यांनी मिळून तोफा झाडायला सुरवात केली. यात दुसऱ्या टीम मध्ये जाऊन सईने आणि पुष्कर ने चक्क माती खाल्ली आहे. आस्ताद आणि रेशम ही विरूद्ध टीम मेघा आणि सईला नेहमीच पाण्यात बघतात. पण सई आणि पुष्करने गप्प बसावे ना? काहीही झाले तरी मेघाविरूद्ध विरूद्ध टीम मध्ये जाऊन आरडा ओरडा करणे कितपत योग्य आहे? असे केल्याने सई आणि पुष्कर बद्दलचे मत चांगले होत नाहीये हे त्यांना कळायला हवे. पेक्षक बघत आहे. यात काय होणार आहे की मेघालाच जास्त मते मिळणार आहेत. सई बद्दल जितकी आरडाओरड होत आहे तितकी ती नक्कीच वाईट नाहिये.




मेघाने सासू-सून सासू - जावई या टास्क मध्ये मेघाने आधी पुष्करला खुप त्रास दिला. आणि त्याचा बदला म्हणून नंतर पुष्करने ही मेघाला खूप त्रास दिला. अर्थात त्रास देणे असाच टास्क होता आणि त्या त्रासाला कंटाळून गेम मधून बाहेर पडायचे होते. जश्याच तसेच झाले हे निर्विवाद. पण म्हणून लगेच पुढे जाऊन दुसऱ्या टीम मध्ये घुसून त्यांच्या आवाजात आपलाही आवाज मिळवणे हे सई ने आणि पुषकरने अजिबात चांगले केले नाहीये. त्यातूनही सई आणि पुष्करची चांगली फ्रेंडशिप आहे हे चांगलेच आहे पण म्हणून सईने फक्त पुष्करची बाजू घेऊन मेघाला बोलायला नको होते. तिने दोघांनाही समजावून सांगायला हवे होते की जे शर्मिष्ठाने केले. आस्दात तर एक नंबरचा डबल ढोलकी आहे. रेशम तर अजिबात कशात भाग घेत नाही. जशी मेघा टास्क कसा जिंकू याचा विचार करते तसेच सई कडून प्रेक्षकांची छान करमणूकही होते. सई पण सगळ्यांच्या ४० - ५० पोळ्या करते हे उषा नाडकर्णी यांनीच सांगितले आहे.. सई टास्क मध्ये डोकेही लढवते त्याचप्रमाणे ती करमणूकही करते. मेघाकडून करमणूक अजिबातच होत नाही. पुष्करने विचार करून थोडा संयम राखायला हवा होता हे अगदी मनापासून वाटते.
Rohini Gore

2 comments:

dr mohan said...

the problem about sai and pushkar in my view is that they try to play game as a team not as individual .

rohinivinayak said...

Thank you !!