Wednesday, June 22, 2011

अनामिका ...(4)



हॉस्पिटलमधून आल्यावर आत्याबाई बऱ्यापैकी स्थिरस्थावर होतात. त्यांचा मुलगा अनिल आत्याबाईंना रोजच्या रोज , औषधे वेळेवर घेत जा, रागीटपणा कमी कर असे बजावत असतो, कारण की आता यापुढे काही झाले तर डॉक्टर आपल्यालाच दोषी ठरवतील असे त्याला वाटत असते. डॉक्टर अनिलला सांगतात, तुमच्या आईला मोठा हार्ट ऍटॅक येऊन गेला आहे. त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्या वाचल्या, पण वेळेवर औषधपाणी, जेवणखाण याकडे आता तुम्हालाच लक्ष द्यायला हवे. आणि दुसरे म्हणजे त्यांना राग येईल, त्रास होईल असे काहीही होऊन देऊ नका म्हणजे मग काहीच काळजी नाही.









यापुढे आत्याबाईंना त्रास होईल, राग येईल असे काहीच घडणार नसते कारण की हॉस्पिटलमध्ये असतानाच आत्याबाईंनी त्यांच्या भावाकडून व मुलाकडून वचन घेतलेले असते आणि ते म्हणजे संजलीला या घरची सून करून घेण्याचे वचन. आत्याबाई हॉस्पिटलमध्ये असताना खूप विचार करतात आणि संजलीला लग्नाची मागणी घालण्याचे निश्चित करतात आणि तेव्हापासून त्यांच्या तब्येतील फरक पडायला लागतो. त्या विचार करतात की एक तर आपण या ऍटॅकमधून वाचलेले आहोत. आताच आपण काही हालचाल केली नाही तर एके दिवशी संजली व अमितच्या लग्नाची बातमी येईल. लक्ष्मी ज्या अर्थी एवढे सांगत होती त्याअर्थी त्यात काहीतरी तथ्य नक्किच असले पाहिजे. आणि संजली व अमितला मी कधीही एकत्र बघू शकत नाही. आजारपणाचे निमित्त करून वेळीसच झटपट हालचाली करायला हव्यात हे तर अगदी त्यांच्या मनानेच घेतलेले असते.







संजलीच्या आईवडिलांना हा लग्नाचा प्रस्ताव आत्याबाईंकडून अशा पद्धतीने येईल असे कधीच वाटलेले नसते. खरे तर अश्या प्रकारे लग्नाचा धक्काच त्यांना बसतो. आत्याबाईंचा भाऊ त्यांना समजावतो पण त्याचा काही उपयोग होत नाही. त्या संजलीला सून करून घेण्याचा हेकाच धरून बसतात. संजलीचे आईवडिल यावर विचार करतात आणि नंतर होकार कळवतात. एक तर या स्थळामध्ये काही खोट काढण्यासारखे नसते. वडिलोपार्जित गडगंज इस्टेट, मुलगाही स्वकर्तबगार असतो. रूपानेही चांगला असतो, फक्त त्यांना संजलीचे शिक्षण पूर्ण होऊन तिला तिचा जोडीदार कसा हवा हे विचारून संजलीचे लग्न करायचे असते. संजली तर हा लग्नाचा प्रस्ताव ऐकून खूप चिडते आणि म्हणते , मला तर आत्ता लग्नच करायचे नाही. मी खूप शिकणार आहे. मला प्रोफेसर व्हायचे आहे आणि जो मुलगा माझ्या आईवडिलांना सांभाळेल त्याच्याशीच मी लग्न करेन. असे ठामपणे सांगते. शेवटी संजलीला आईवडिल खूप प्रकारे समजावतात. आत्याबाईंची तब्येत, स्थळ म्हणून कसे चांगले आहे. शिवाय मुलगा पण काहीही न करता इस्टेटीत लोळणारा नाहीये, तुझे शिक्षणही नक्किच आत्याबाई पूर्ण करतील असा विश्वास तिला देतात. शिवाय हे पण समजावतात की आत्याबाईंचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांनी आमच्या संसारात काही प्रसंगी खूप मदत केली आहे.






अनिल या लग्नाला तयार असतो कारण की त्याच्यापुढे दुसरा पर्यायच उरत नाही. नकार कशासाठी देणार? संजली रुपाने खूप चांगली आहे शिवाय समजूतदार आहे. फक्त त्याला इतक्यात लग्न करायचे नसते. संजलीला सून करून घेण्याचा विचार आईच्या डोक्यात का आणि कसा आला याचा मात्र खूप विचार करूनही त्याला उत्तर सापडत नाही. तसा तो आईला ओळखून असतो. तिच्या मनात नक्की काहीतरी विचारचक्र चालू आहे पण ते कोणते आहे आणि या प्रकारचा लग्नाचा प्रस्ताव तिच्या मनात का आला आहे याचा मात्र त्याला थांगपत्ता लागत नाही. आपली आई हट्टी व रागीट आहे याबद्दलचे आईचे रूप अनिलने पूर्वीही बघितलेले असते पण एकीकडे ती किती कर्तबगार आहे याची जाणीवही असते. तिचा स्वभाव प्रेमळ आहे ती कुणाचे कधी वाईट अरणार नाही याची खात्रीही असते.









संजलीचे कॉलेजचे पुढचे वर्ष सुरू होण्याच्या आतच लग्न लावू असे आत्याबाईंचे मत असते. वार्षिक परीक्षाही नुकत्याच झालेल्या असतात. सुट्टीही चालू असते. आत्याबाईंच्या मतानुसार लग्नाच्या तयारीला सुरवात होते. १५ दिवसाच्या आत सर्व तयारी होणार असते कारण की लग्नाला योग्य असा चांगला मुहूर्तही येणाऱ्या काही दिवसातच असतो. संजली व तिच्या आईच्या आत्याबाईंकडे फेऱ्या सुरू होतात. कधी साडी खरेदी निमित्ताने, तर कधी रुखवतात काय ठेवायचे, देण्याघेण्याच्या साड्या खरेदी, कोणते कार्यालय, किती माणसे बोलवायची. हे आणि ते अशा बऱ्याच याद्या. आत्याबाईंना खूप उत्साह आलेला असतो. संजली तर त्यांना आवडत असतेच पण आता ती या घराची सून होणार म्हणून तिची सर्व हौसमौज पुरवण्याकरता तिला काय हवे काय नको अशी त्यांची विचारपूस सुरू होते. लग्नात घालण्याकरता तिच्या पसंतीचे दागिने, बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, केळवणे या ना त्या प्रकारची सर्व धांदल, घाईगडबड सुरू होते. वाड्यातील सर्व नोकर मंडळी कामाला लागतात. लग्ना आधीच वाड्यावर लोंकाची ये जा, वर्दळ सुरू होऊन काही वेळेला अनिल संजलीला आत्याबाई मुद्दामहून कोणत्यातरी कामाला पाठवतात कारण की त्यानिमित्ताने त्यांनाही जरा गप्पा मारता येतील. लग्नाचे त्यांचे असे काही वेगळे ठरवायचे असेल तर तेही त्या दोघांना मनमोकळेपणाने ठरवता येईल. शिवाय गप्पांमधून लग्ना आधी एकमेकांची आवडनिवड कळेल .









लग्नाचा दिवस उजाडतो. पुण्यातले मोठे कार्यालय घेऊन खूपच दणक्यात लग्न पार पडते. संजलीला लग्नाच्या दिवशी खूप सजवतात. आत्याबाईंनी तिच्याकरता मरून रंगाचा शालू तिच्या आवडीने घेतलेला असतो. सोन्याच्या प्रत्येक दागिन्याने संजली सजते. सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, तोडे, गोठ, वाकी, नथ, पोहेहार, नेकलेस, अंगठी, बिंदी, कानातले झुमके, मेखला, हिरवा चुडा भरून संजली गौरीहार पूजायला बसते. संजलीचा स्वभाव पण हौसमौज करून घेण्याचा असतो त्यामुळे तीही आनंदात असते. आपण इतक्यात लग्न करणार नव्हतो हे ती पार विसरून जाते. अनिलकडे आता ती तो आपला होणारा नवरा या नात्याने बघते. तसे तर आत्याबाईंचा हा भाऊ मानलेलाच असतो. खूप दूरच्या नात्यातला पण नोकरीनिमित्ताने पुण्यात राहिलेला असतो. पुण्यात असल्याने आत्याबाई व त्यांचे येणे जाणे असते. शिवाय त्याच्या संसारात आत्याबाईंनी वेळोवेळी मदतही केली असते. लग्नात प्रत्येक जण संजलीचे कौतुक करत असतो. शुभमंगल होते. लाजाहोम होतो आणि अनिल संजलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. मंगळसूत्र घातल्यावर तर संजलीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. अनिलबरोबर संजलीचा वाड्यात गृहप्रवेश होतो.







दुसऱ्या दिवशी सत्यनारायण होतो आणि हळुहळू करत लग्नात जमलेली पाहुणे मंडळी त्यांच्या घरी जायला निघू लागतात. आता संजलीचे वेगळे दैनंदिन जीवन सुरू होते. घरामध्ये काम असे काही नसतेच. नोकरांना कामे सांगून ती करवून घेणे हेच एक मोठे काम असते पण हे काम पण आत्याबाई तिच्यावर लगेच सोपवत नाहीत. एके दिवशी अनिल संजलीला आत्याबाई त्यांच्या खोलीत बोलावून घेतात आणि सांगतात की तुम्ही दोघांनीही माझे ऐकलेत व लग्नाला होकार दिला. मी आता खूप खुशीत आहे. संजली तू तुझ्या आईवडिलांची मुळीच काळजी करू नकोस. माझे त्यांच्याकडे लक्ष आहे. आणि हो तुझे शिक्षणही तू पूर्ण कर. ती सर्व जबाबदारी माझी पण त्यानंतर मात्र मी वाड्याची सर्व जबाबदारी तुझ्यावर सोपवणार आहे आणि ती तू चांगल्या रितीने पार पाडशील अशी माझी खात्री आहे.


क्रमश:

9 comments:

विनायक पंडित said...

तुमचा ब्लॉग खरंच खूप छान आहे! फोटोज आणि त्याला फूरक असं तुमचं नेमकं लिखाण वाचून खूप आनंद झाला! :)

rohinivinayak said...

Thank you so much!!

Anonymous said...

Rohini Tai, ha bhaag pan chaan lihila ahe tumhi. :) Lagnachi tayaari,khaderi va lagnaatlya chaali-riti vachun masta vatla. Dolyapudhe natleli sundar Sanjali ubhi kelit tumhi. :) Khup chaan lihita, ashyach lihit raha!!!

Sanjali hya lagnasathi tayyar jhaali hey vachun ashcharya vatla. Aatyabai tichya sakhya aatya naslya tari agdi lahanpana pasun tyancha kade yena-jana aslya mulay Anil tila bhaava sarkhach vatat asnar. Aatyabaini tichya aai-vadlana velo-veli bahin mhanun maddat keli pan tya sathi ashi parat-fed tila kashi kaay patli? Maala Amitcha khup mhanjey khupach vait vattay. :( Ata tyaala kallyavar toh bichchara khup udas hoil.

Baghitlat! :) tumcha goshtitli patra kalpanik astil pan tumhi ashya prakarani hi goshta lihitay ki khup involve hoila hota va hey saagla khaarach vatta. Sanjali majhi maitrin asti tar me tila khup samjavla asta ki hey lagna nako karus mhanun.

rohinivinayak said...

khare tar sanjali ya lagnala tayar naste. pan ha part mala jast rangavta aala nahi.



aani amit tichyavar prem karto he tila mahit nahi. te mahit aste tar ti lagnala tayar jhali nasti. Amit udas tar jhalach aahe pan to kasa aani tyane konta prakarcha turn ghetla he pudhe yeilch.



aani sanjali ajun lahan aahe aani aatyabainchya mothya aajarane saglyanach ha nirnay manya karava lagla.

Amit var tar tya pahilyapasun naraj astat aani eka pathpath asha ghatana ghadtat ki aatyabaina amit sanjaliche lagna ajibaat hota kama naye he tyanchya mananech ghetle aahe. tasha tar tyanchya mulala khup shreemant paisevale sthal nakkich sangun aale aste. pudhil story madhe flash back aahe purnapane.



tumhi ya story madhe involve jhala he vachun khup khup aanand jhala aahe mala. hich story amit va sanjaliche lagn lavun pan karta yeil aani mag natar pudhe lagna natar kahitari problem vagere ase kahitari karta yeil. ek vegli story!

mala kharach khup chhan vatat aahe tumcha abhipyay vachun. Anek Anek Dhanyawaad!!!

Anonymous said...

So obvious and 'Ghisi Peeti' story. No new imagination. Ani 'Vartaman kaLatil' kathan tar agadi khaDa lagalya sarakhe vaTate.!!

Anonymous said...

Rohini Tai, Barobar mhantay tumhi. Tumche saagle points patley maala. Tumhi tumcha patrana jitka changlyane olakhta titka konhich olakhu shakat nahi.

Tumchya likanyaat hi pan ek prakarchi kushaltach ahe ki tumhi unexpected turns deta va goshit ruchi kayam thevta. 'Ata pudhe kaay honar?' ha prashna dokyaat yetoch kontahi bhaag vachlyavar.

Amit-Sanjalicha lagna hona hey farach expected hota tyapeksha tumhi hey asa karun nakkich pudhchya bhaaga vishayi navin possibilities nirmaan kelya ahet.

Tumhi maanapasun lihitay na mhanun vachtana dekhil maan guntavla jaatay. Kharach vatat nahi ki hi tumchi pahili goshta ahe te! Tumhaala majhya maanapasun shubhechcha! :)

दिप्ती जोशी said...

Chaan kathanak, aavadali.

Bhagyashree said...

Pudhcha bhag lavkar taka na...khup utsukta lagli ahe pudhe kay honar yachi...waiting for next part soon!!!!

rohinivinayak said...

hoho, nakki takate lavkarach.:) thank you so much for your comment!!!:)