Monday, February 20, 2012

अनामिका (७)




मॉलच्या जवळच असलेल्या एका इराण्याच्या हॉटेलमध्ये अमितसंजली भेटायचे ठरवता. हे हॉटेल एका गल्लीबोळात असते. अमित म्हणतो या हॉटेलमध्ये मी मेहुण्याबरोबर एक दोन वेळा आलो आहे. एकदम शांतता असते इथे. शनि-रविवारी गर्दी असते असे मला मेहुणा सांगत होता. चल निघू मी आता? "थांब ना थोडावेळ. एक १० मिनिटांत निघू आपण. मी मॉलकडे वळते व तू घरी जा. बाय द वे तू मुंबईत कोणाकडे राहतोस? अमित तिला सांगतो "मुंबईत बायकोच्या माहेरीच राहतो. यावर्षी ती आली नाही. माझ्या आईची तब्येत जरा बरी नव्हती म्हणून मी एकटाच आलो आहे. संजली म्हणते बरं बरं उद्या १० ला नक्की भेटूया. मी मैत्रिणींना सांगते की मला नातेवाईकांकडे जायचे आहे. तू मात्र वेळेवर हजर राहा हं. इथेच भेटू आणि मग नंतर जाऊ हॉटेलमध्ये. काही वेळाने ते दोघे निघतात. मैत्रिणींबरोबर भटकून संजली व तिच्या मैत्रिणी उशीरानेच घरी येतात. लग्नघरी गप्पा टप्पा करून उद्या मी सकाळी नाही गं, मला इथे राहाणाऱ्या सासूबाईंच्या बहिणीकडे जायचे आहे. फोनवरून त्यांनी मला सांगितले की तिला भेटून ये म्हणून. जेवण उरकून संजली झोपायला जाते. झोपताना विचार करते हे असे एकदम काय झाले? म्हणजे अमित कुठे असेल काय करत असेल असे मनात येत होते, पण लग्न झाल्यापासून निवांत असा विचार करायला, कुणाशी बोलायला, कोणाकडे जायला वेळ कसा तो मिळालाच नाही आपल्याला. मध्ये इतकी वर्षे गेली आणि अचानक असा हा योगायोग! किती छान! पण बोलताना तो असे काय म्हणाला की मला तुझे लग्न झाले ते माहीत आहे पण आलो नाही, का आला नसेल हा? उद्या विचारूच आपण त्याला. उद्या साडी नेसायची की ड्रेस घालायचा या विचारात तिचे हिरवीगार व त्याला मरून रंगाचे काठ असलेली साडी नेसण्याचे ठरते. सकाळी उठल्यावर पटापट आवरून मॉलच्या गेटपाशी उभी राहते. १० वाजून १० मिनिटे होतात तरी अमितचा पत्त्ता नसतो. याला फोन करावा का? असे म्हणून ती नंबर डायल करते.










नंबर डायल करून इकडे तिकडे बघत असतानाच तिला समोरून अमित येताना दिसतो. मोरपंखी रंगाकडे झुकणारा टी शर्ट व काळी पँट त्याने घातलेली असते. उंच व सावळ्या रंगाचा अमित टी शर्ट मध्ये छान दिसत असतो. संजली मनातच किती उंच व अंगाखाद्याने मजबूत आहे हा, मस्त दिसतोय, फुलशर्टपेक्षा याला टी शर्ट जास्त खुलून दिसत आहे. अमितही संजलीकडे बघत बघत येत असतो. मनात म्हणतो कोणताही रंग घ्या हिला शोभूनच दिसतो. पारदर्शक हिरव्यागार साडीमध्ये तर ही किती गोरी आणि नाजूक दिसत आहे! "चल. उशीर झाला ना मला." "नाही रे, मी पण इतक्यातच आली आहे" दोघेजण इराण्याच्या हॉटेलमध्ये येतात. तिथला मालक म्हणतो "साहेब तुम्ही वरच्या फॅमिली रूममध्ये जाऊन बसा. तिथे एकदम निवांतपणा भेटेल आपल्याला" संजली अमित हॉटेलमध्ये येऊन बसतात व अमित दोन चहाची ऑर्डर देतो. थोड्यावेळाने चहा येतो. चहा घेता घेता बोलायला कुठून व कशी सुरवात करायची अशा विचारात असताना संजली विचारते अरे तू म्हणालास की माझे लग्न झालेले तुला माहीत आहे तर तू का आला नाहीस लग्नाला? अमित म्हणतो तू काल विचारलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे का नाही यावर मी खूप विचार केला पण सत्य परिस्थिती तुला समजायचा हवी त्यामुळे मी आता तुला सविस्तरच सांगतो. तुझ्या लग्नाची पत्रिका आमच्या घरच्या टेबलावर पाहिली आणि माझ्या मनाची अवस्था काय झाली हे तू विचारू नकोस. मी तातडीने आलेली नोकरी स्विकारली व बंगलोरला गेलो.









अंग खरं सांगू का संजली मला तुझ्याशीच लग्न करायचे होते. मला तू खूप आवडायचीस. डोळे विस्फारून संजली त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते अरे तू पण मला खूप आवडायचास पण लग्न वगैरे माझ्या डोक्यातच आले नाही आणि त्या दृष्टीने मी तुझ्याकडे कधी पाहिलेच नाही. अमित म्हणतो अंग तू खूप लहान होतीस आणि तुला आठवते का? तुळशीचे लग्न? "हो हो आठवते की. कित्ती मजा केली होती ना आपण सर्वांनी मिळून" त्यादिवशी मी तुला पहिल्याप्रथमच साडीत पाहिले. तू खूप सुंदर दिसत होतीस आणि त्यादिवशीच मी मनाशी ठरवले की लग्न करायचे ते तुझ्याशीच. पण अगं त्यावेळेला माझे शिक्षणही पूर्ण झाले नव्हते आणि नोकरीशिवाय कसे काय मी तुला मागणी घालणार होतो? आणि दुसरे महत्त्वाचे ऐक. तुझ्या सासुबाई म्हणजे त्या आत्याबाई त्यांना मी तुझ्याशी बोलतो ते कधीही आवडायचे नाही. मला ते चांगलेच जाणवायचे. त्यांना असे वाटायचे की म्हणूनच मी त्यांच्या घरी येत आहे. असे काहीही नव्हते. अनिल माझा शाळेपासूनचा मित्र आहे. आणि तिथे तर तुमच्या सर्व भावंडांचा आणि अनिलच्या मित्रांचा अड्डा असायचा. अर्थात जास्त करून लहानपणी. नंतर काही कार्यक्रमानिमित्तानेच भेट व्हायची आपली. आणि सगळ्यात कहर म्हणजे आत्याबाई जेव्हा आजारी होत्या तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो तर त्यांनि चक्क मान फिरवली दुसरीकडे मला बघून. तेव्हापासून मी ठरवले की या घरात कधीही पाऊल टाकायचे नाही. मला काय स्वाभिमान आहे का नाही? माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर तुझ्या घरी मी पेढे द्यायला आलो होतो. तुझ्या बाबा मला सारखे म्हणत एकदा येऊन जा आमच्याकडे. तर पेढे द्यायच्या निमित्ताने मी आलो होतो आठवते का? त्यानंतरही एक दोन वेळा मि तुला माझ्या मनात काय आहे ते सांगणार होतो आणि तुझेही मत जाणून घेणार होतो. मलाही आता ते आठवत नाहीये. तुला आठवते का ते बघ. आता एकूणच या सर्व गोष्टी बोलून काहीही फायदा नाहीये. जाऊ दे.










हे सर्व ऐकत असताना संजली तिच्यातच इतकी हरवून गेलेली असते की तिला हसावे की रडावे हेच कळेनासे होते. अमितही मध्येच थांबतो आणि म्हणतो अगं कुठे हरवलीस. सॉरी मी हे काय बोलून बसलो. चहा थंड झाला तुझा. अजून एक मागवतो. तितक्यात वेटर येतो. साहेब मालकांनी विचारले आहे की जेवणार का? राईसप्लेट तयार आहे. नको. जेवण नको. संजली तू बटाटेवडे खाणार का? ती मानेनेच होकार देत आणि थोड्यावेळात त्यांच्या टेबलावर गरम गरम बटाटेवडे येतात. संजली सॉरी, मी जरा जास्तीच बोललो. तू विचारलेस म्हणून मी सांगितले नाहीतर मी हे कधीही बोललो नसतो. इतक्या वर्षांनी का होईना पण मला तू भेटलीस हेच खूप आहे. संजली म्हणते "हो हो. तू सॉरी नको म्हणूस मी सिरिअस झाली नाही. मलाही खूप आनंद झाला आहे. मला आत्याचा खूपच राग येतो आहे. तब्येतीचेही तिने नाटकच केले की काय असे वाटू लागले आहे आता मला.








चल आपण विषय बदलू. तू घरीच असतेस का? सबंध दिवस काय करतेस? नोकरी केली नाहीस का कधी? असे विचारून त्या दोघांच्या दुसऱ्या गप्पा सुरू होतात. अमितही तिला अमेरिकेतील वास्तव्याबद्दल सांगतो. बंगलोरला नोकरी करून नंतर कंपनीतर्फेच तो कसा अमेरिकेला आला आणि ती नोकरी सोडून त्याने तिथे एम एस केले, हे आणि ते असे सर्व सांगतो. दुसरा चहाही संपतो. अमित म्हणतो आपण थोडे बीचवर जायचे का? खूप दूर नाहीये. टॅक्सीने जाऊ. नंतर बाहेरच जेवण करून मी तुला तुझ्या इथल्या घरी सोडतो. संजली घड्याळात बघते आणि विचार करते आणि म्हणते चालेल. लग्नघरी आता ग्रहमख व इतर कार्यक्रम चालू असतील. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम संध्याकाळी आहे. त्याच्या आधी पोहोचले म्हणजे झाले. नाहीतरी आता तू तरी मला वरचेवर कुठे भेटणार आहेस. असे म्हणून दोघेही बीचकडे जायला निघतात.

7 comments:

Anonymous said...

Rohini Tai, tumhi paanacha photo taklyavar asa vatla hota ki aata kathecha pudhcha bhaag yeil :) anhi mag baghitla tar aalach hota!

Ha bagh vachtana asa sarkha vatat hote ki hey doghe kahi chukicha kartayt ka? Mhanjey asa ki doghanich ghari saangitla nahiye bhetlyacha kivva asa bhetaycha tharavlyacha. Tyana konhi baghitle tar ugich gair samaj nahi ka honar? Amit tar Anilachach mitra asto mag to bhetlyavar Sanjali Anil la kasey saangat nahi...toh lagnala ala nahi va nantar parat kadhich bhetla nahi yacha doghana prashna padlach asnar.

- Priti

rohinivinayak said...

priti,, doghehi kahi chukiche karat nahiyet karan ki tyanchi bhetach ekdam achanak jhali aahe aani doghana bhetnyachi utsukata aahe. ek tar amit US madhe rahat asto tyamule ithe mumbait tyala koni olkhanre naste, anjalila pan koni olakhanare naste tyamule koni agadi lagechch pahun chugli karel ase honar nahi.

koni pahile tar mag agadi te typical tv serials astat na tase valaN gheil hi katha. mumbai itaki vast aahe tyamule agadi lagechch koni pahil yachi bhiti nahi. jar ka hi doghe ekach shaharat rahat asti aani varchevar bhetat asti tar matra tyanna nakkich koni pahil ka hi bhiti rahil aani mag ti typical katha hoil, black mail vagare. amit lagech US la jaat aahe aani sanjali aata punyat jaoon anil la sangnar nahi. karan ki tila amit kadun ek veglach dhakka basla aahe. ervai tine anil la lagech sangitle aste.

baghu aata pudhchi katha kashi aani kuthe valvaychi yacha vichar karava lagel tyamule thoda ushir hoil. next part lagech lihin, pan tyapudhe jara vichar karava lagel. yamadhe anil cha role hi dakhavnar aahe karan ki te doghe mitra astat.

baghu aata kashi kaay jamte katha pudhchi kaay mahit ;) aataparyat tari bari chalali ahe ase vatate,, pan katha lihine mhanje jara dokedukhich aahe. magche pudhche sandarbph neet dyayla lagtat.

hi katha tu manapasun vachat aahes aani ajun kahi blog vachak maitrinihi vachat aahe tyamule lihayla pan utsah yeto nahitar katha lihili geli nast ;) thanks a lottt,,, priti aani sarvjan ki je katha vachat aahe tyanahi

priti tu lagech comment detes mhanun mala feedback milto, aani utsukatene vachtes yacha aanand hi hoto, thanks...

rohinivinayak said...

aani aataparyat mi sadharan baghitle aahe ki mulichya lagna nantar ekunach sarvach badalate. pahile nate sambandh kinva mitra maitrinihi nokri nimitta kinva lagna jhalyavar tyanche life ch ekdam vegle houn jate. aani achanak kadhitari agadi quachit pan ekhadyachya life madhe ase ekdam ulte sulte tyanna mahit naslele ase kalte ani life vegle valan gheoo shakte,, ase itaratra ekun pahatana, aiktana kalte.

Anonymous said...

Rohini Tai, tumhi itkya maanapasun lihit ahat hi katha..itka vichar karun anhi magche sandharbha dharun...ki vachnaryache maan hya kathet gunthun jaate. Bagha na, me pan Sanjali-Amit-Anil hey sarva eka goshtiche patra nasun aplya madhlech ek ahet :) va tyaancha konhi gair samaj karun gheu naye ashi kalji karu lagle! :) Ata majhech comment vachun maala hasu yetay :) pan khara tar hey tumcha likhanachich kammal ahe ki tumhi hya kathechya patrana itka jivanta karta anhi amchyaat pudhe kaay hoil hyaachi utsukta nehemi nimaan karta.

- Priti

rohinivinayak said...

thanks priti,,, aata khare tar mala tula pahaychi khup utsukata lagun rahili aahe,, ;) tu kontya social site var astes ki jithe mala tula pahata yeil :) agadi pratyaxaat bhet nahi tari phototun tari tula pahata yeil itaki mala utsukata lagun rahili aahe...tu pan kahi lihites ka? kaay kartes vagere sarv utsukata lagli aahe..

rohinivinayak said...

tu californiat aahes ka?

Anonymous said...

Ho na kharaye..lagna nantar kharach khup badalta. Kahi apekshit badal...kahi agdi anapekshit. Anhi asa hi hota ki konha kadun achanak kahi asa kalta ki tyane aplya vicharan var kivva kahi vyaktinbaddhal ekdum vegla maat hota.

Apli pratyakshya bhet nakki hoil :) anhi me khup utsukta ahe tya sathi, baghu kadhi ghadun yete apli bhet. Me nahiye ho social sites var, adhi hote pan maala faar nad lagto tyacha mhanun muddam dur rahate me.

Amhi Chicago javal rahato.

- Priti